AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राम मंदिराबाबत पाकिस्तानातील लोकांना काय वाटतं, तरुणीने केली पोलखोल

Ayodhya Ram Mandir : भारतात सगळीकडेच राम मंदिराच्या उद्घाटनाबाबत उत्सूकता दिसून येत आहे. अनेक ठिकाणी कलश यात्रा देखील काढण्यात येत आहे, रामलल्लाच्या दर्शनसाठी लोकं आतुर झाले आहे, २२ जानेवारी रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पण अयोध्येत होत असलेल्या राम मंदिराबाबत पाकिस्तानातील लोकांना काय वाटतंय जाणून घ्या.

राम मंदिराबाबत पाकिस्तानातील लोकांना काय वाटतं, तरुणीने केली पोलखोल
| Updated on: Jan 05, 2024 | 7:54 PM
Share

Pakistan On Ayodhya Ram Mandir : अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.  राम मंदिराबाबत देशभरातील उत्साहाचं वातावरण आहे. अनेक ठिकाणी यात्रा काढल्या जात आहेत. रामलल्लाच्या दर्शनासाठी लोक उत्सूक आहेत. पण भारताचा शेजारी देश पाकिस्तानमधील लोक राम मंदिराच्या उभारणीवर नाराज असल्याचे दिसत आहे. महिला YouTuber सना अमजद यांनी पाकिस्तानच्या लोकांची यावर प्रतिक्रिया घेतली. अनेकांनी राम मंदिरावर आक्षेप घेतला.

पाकिस्तानी लोकं राम मंदिराच्या मुद्द्यावर चांगलेच आक्रमक पाहायला मिळाले. राम मंदिराला त्यांचा विरोध होता. बाबरी मशीद पाडल्याने त्यांचा आक्रोश दिसून येत होता. त्याच ठिकाणी मंदिर बांधले जात असल्याने हा मुस्लिमांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न असल्याचं अनेकांचं मत होतं.

राम मंदिराचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थित करण्याबाबत काही लोकांचं मत होतं. भारतात लोकशाही दिसत नसल्याचं काही लोकांनी म्हटलं. पाकिस्तानातील नेत्यांनी ही गोष्ट आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थित करावे असे ते म्हणत होते.

यूट्यूबरने त्यानंतर पाकिस्तानातील लोकांची फिरकी घेतली. ती म्हणाली की, बाबरी मशिदीच्या जागेवर पूर्वी मंदिर होते. हे त्यांनी सिद्ध केले आहे. पाकिस्तानात किती हिंदू मंदिरे होती. ती मंदिरे पाडण्यात आली. याबाबत कोणी बोलत नाही.

पाकिस्तान हिंदू राइट्स मूव्हमेंटच्या माहितीनुसार 1947 मध्ये पाकिस्तानत 428 हिंदूंची मंदिरे होती. 1990 च्या दशकात 408 मंदिरे तोडण्यात आली. त्या मंदिरांच्या जागी रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, सरकारी शाळा किंवा मदरशे बनवण्यात आली.

अयोध्या बनणार धार्मिक केंद्र

अयोध्येत उभारले जात असलेले राम मंदिर हे देशातील आता आणखा एक मोठे धार्मिक केंद्र बनणार आहे. रामजन्मभूमी मंदिरात दररोज हजारो लोकं दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. आगामी काळात अयोध्या व्यावसायाच्या दृष्टीकोनातून देखील एक मोठे केंद्र बनणार आहे. ज्याचा फायदा येथील स्थानिक लोकांना होणार आहे. सोबत लाखो लोकांना रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होणार आहे. अनेक कंपन्या येथे गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहेत.

फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर.
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न.
छगन भुजबळांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र! पत्रात काय?
छगन भुजबळांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र! पत्रात काय?.
पंतप्रधानांच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला गती मिळाली! फडणवीसांचं मत
पंतप्रधानांच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला गती मिळाली! फडणवीसांचं मत.
संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळा; लाखो भाविकांची शेगावात मांदियाळी
संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळा; लाखो भाविकांची शेगावात मांदियाळी.
प्रकट दिनानिमित्त गजानन महाराजांच्या मंदिरात भक्तांची गर्दी
प्रकट दिनानिमित्त गजानन महाराजांच्या मंदिरात भक्तांची गर्दी.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगरमध्ये दाखल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगरमध्ये दाखल.
19 ते 25 वर्षात लग्न, 3 मुलं व्हावी असं शास्त्र सांगतं - मोहन भागवत
19 ते 25 वर्षात लग्न, 3 मुलं व्हावी असं शास्त्र सांगतं - मोहन भागवत.
संभाजीनगरात CTET केंद्रावर दागिने काढायला लावल्याने वाद!
संभाजीनगरात CTET केंद्रावर दागिने काढायला लावल्याने वाद!.