AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जनगणनेसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या प्रश्नाला चुकीचं उत्तर दिलं तर काय होतं? किती वर्ष जेलमध्ये जावं लागतं?

भारतामध्ये जनगणनेची जोरदार तयारी सुरू आहे, पुढच्या वर्षी जनगणना होणार आहे, पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? समजा तुम्ही जर जनगणना करणाऱ्या अधिकाऱ्याच्या प्रश्नाला चुकीचं उत्तर दिलं तर काय होऊ शकतं?

जनगणनेसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या प्रश्नाला चुकीचं उत्तर दिलं तर काय होतं? किती वर्ष जेलमध्ये जावं लागतं?
जनगणना 2027Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 15, 2026 | 6:42 PM
Share

भारतामध्ये 2027 मध्ये होणाऱ्या जनगणनेची जोरदार तयारी सुरू आहे. गृहमंत्रालयाकडून त्या 40 प्रश्नांची यादी देखील तयार करण्यात आली आहे, जे प्रश्न जनगणनेच्यावेळी विचारण्यात येणार आहेत. या जनगणनेच्या माध्यमातून जी माहिती गोळा केली जाते, जसं की देशात एकूण लोकसंख्या किती आहे? लोकांच्या रहाण्याचा दर्जा तसेच सामाजिक, आर्थिक स्थर याबद्दलची माहिती सरकारला मिळते, या माहितीचा फायदा हा सरकारला पुढील दहा वर्षांचं नियोजन करताना होतो, दरम्यान आता जनगणनेची सुरुवात होण्यासाठी अवघे काही महिने बाकी आहेत, परंतु अनेकांना असा प्रश्न पडला आहे की, समजा जर जनगणनेची माहिती विचारताना आपण जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिलं तर काय होतं? आपल्याला शिक्षा होऊ शकते का?

जनगणनेच्या वेळी अधिकारी जे प्रश्न विचारतात, त्या प्रश्नांची उत्तर योग्य देणं, तसेच कोणत्याही प्रकारची खोटी माहिती न देणं बंधनकारक असतं. 1948 अंतर्गत तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना सर्व खरी माहिती देणं, त्यांची कुठल्याही प्रकारची दिशाभूल न करणं हे तुमचं कायदेशीर कर्तव्य आहे. कारण जनगणनेच्या माध्यमातून ज्या माहितीचं संकलन होतं, ती माहिती देशातील आरोग्य व्यवस्था, नागरिकांचे रहाणीमान, देशातील पायाभूत सुविधा यांचं नियोजन करण्यासाठी महत्त्वाची असते.

जर तुम्ही जनगणनेच्या कामासाठी आलेल्या अधिकार्‍याला जाणीवपूर्वक चुकीची माहिती दिली, अथवा त्यांच्या कार्यात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर तो एक गुन्हा मानला जातो, त्यासाठी तुम्हाला तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते, किंवा एक हजार रुपयांचा दंड देखील होऊ शकतो. काही प्रसंगात दंड आणि जेल अशा दोन्ही शिक्षा एकाच वेळी होऊ शकतात, त्यामुळे जनगणनेच्या कामासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना योग्य ती माहितीच दिली पाहिजे, जाणीवपूर्वक खोटी माहिती देऊ नये. समजा तुम्ही जर तुमची माहिती जाणीवपूर्वक चुकीची दिली नसेल, अनावधानाने तुमच्याकडून चुकीची माहिती गेली असेल तर अशा स्थितीमध्ये तुमच्यावर कोणतीही कारवाई होत नाही, मात्र चुकीची माहिती दिली तर मात्र शिक्षा होऊ शकते.

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती