AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

What India Thinks Today : नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासूनच विकासाला सुरुवात झाली; सरकारने अनेक योजना सुरू केल्या – पुरी

TV9 न्यूज नेटवर्कच्या वतीने 'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे' या ग्लोबल समिटचे आयोजन करण्यात आले आहे. या समिटमध्ये पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी संवाद साधला. यावेळी पुरी यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली.

What India Thinks Today : नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासूनच विकासाला सुरुवात झाली; सरकारने अनेक योजना सुरू केल्या - पुरी
| Updated on: Jun 18, 2022 | 5:25 PM
Share

नवी दिल्ली : TV9 न्यूज नेटवर्कच्या वतीने ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ (What India Thinks Today Global Summit) या ग्लोबल समिटचे आयोजन करण्यात आले आहे. आज या ग्लोबल समिटचा दुसरा दिवस आहे. राजकारण, क्रीडा, समाजकारण, संस्कृती, उद्योग, व्यापर अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर या समिटमध्ये विचारमंथन चालू आहे. भारतासह जगभरातील अनेक नामवंत व्यक्ती या ग्लोबस समिटमध्ये सहभागी झाले आहेत. टीव्ही 9 च्या या मंचावरून केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी (Hardeep Singh Puri) यांनी संवाद साधला. यावेळी बोलतान त्यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm modi) 2014 साली सत्तेवर आले आणि तेव्हापासूनच विकास कामांना सुरुवात झाली. केंद्राच्या अशा अनेक योजना आहेत, ज्यांनी सामान्य मानसांच्या जीवनात क्रांती आणली. त्यामध्ये स्वच्छ भारत मिशन, पंतप्रधान आवास योजना यासारख्या अनेक योजनांचा समावेश आहे. 2022 पर्यंत प्रत्येक भारतीय नागरिकाकडे त्याचे स्वत:चे घर असायला हवे असं मोदींनी म्हटलं होतं. त्या पार्श्वभूमीवर राज्याकडून माहिती मागवण्यात आली होती. तेव्हा एक कोटी घराची गरज असल्याचे समोर आले होते. मात्र तुम्हाला हे ऐकूण आनंद होईल की केंद्र सरकारने एक कोटी 22 लाख घरांना मंजुरी दिल्याचे पुरी यांनी म्हटले आहे.

43 लाख फेरीवाल्यांना कर्ज

पुढे बोलताना पुरी यांनी म्हटले की, लोकांचे आरोग्य सुरक्षीत रहावे, त्यांना चांगले उपचार मिळावे यासाठी केंद्र सरकारने आयुष्मान भारत योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून वर्षभरात पाच लाख रुपयांची सुविधा देण्यात येत आहे. तसेच कोरोना काळात फेरीवाल्यांची अवस्था अत्यंत बिकट बनली होती. व्यवसाय ठप्प असल्याने ते आर्थिक संकटात सापडले होते. मात्र पंतप्रधान मोदींनी त्यांच्यासाठी दहा हजार कर्ज देण्याची योजना सुरू करून पुन्हा एकदा त्यांना उभारी देण्याचे काम केले. जवळपास 43 लाख अधिकृत फेरीवाल्यांनी या योजनेचा लाभ घेतला. केंद्राने या सारख्या अनेक चांगल्या योजना जनतेच्या भल्यासाठी राबवल्या

अग्निपथ बाबत काय म्हणाले पुरी?

दरम्यान सध्या केंद्र सरकारने नुकत्याच आणलेल्या अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध होत आहे. या योजनेला होत असलेल्या विरोधावर देखील यावेळी पुरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधक अग्निपथ बाबत संभ्रम निर्माण करत आहेत. केंद्र सरकारने मागे शेतकऱ्यांसाठी तीन नवे कृषी कायदे तयार केले होते. ते शेतकरी हिताचेच होते. मात्र तेव्हा देखील असाच संभ्रम पसरवण्यात आला. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत भरती होऊ शकली नाही. मात्र आता केंद्राने त्यासाठी खास अग्निपथ ही योजना तयारी केली आहे. या योजनेच्या माध्यमातून तरुणांना आपल्या देश सेवेचे स्वप्न पूर्ण करता येईल व त्याचा त्यांना योग्य मोबदला देखील मिळणार असल्याचे ते म्हणाले.

Follow Us
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!
ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंनी सचिन अहिरांना दिली उपसभापती पदाची...
ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंनी सचिन अहिरांना दिली उपसभापती पदाची उमेदवारी; बिनविरोध निवड होताच केलं मोठं विधान
राज ठाकरे आले... फक्त 15 मिनिटे बोलले, भाजपला दिला सणसणीत इशारा
राज ठाकरे आले... फक्त 15 मिनिटे बोलले, भाजपला दिला सणसणीत इशारा; म्हणाले, आजचं फोडाफोडीचं...
शिंदे सेनेत प्रवेश...थेट उपसभापती! अहिरांच्या नावावर शिक्कामोर्तब
Vidhanparishad | शिंदे सेनेत प्रवेश... आणि थेट उपसभापती! सचिन अहिरांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका? विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका? विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात मोठी खळबळ