AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

What India Thinks Today : कोरोना काळात पंतप्रधान मोदींची संवेदनशिलता अवघ्या जगाने पाहिली – राजनाथ सिंह

देशातील नंबर वन नेटवर्क टीव्ही 9 च्या वतीने ग्लोबल समिटचं आयोजन करण्यात आले आहे. आज या ग्लोबल समिटचा दुसार दिवस आहे. दुसऱ्या दिवशी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संवाद साधला.

What India Thinks Today : कोरोना काळात पंतप्रधान मोदींची संवेदनशिलता अवघ्या जगाने पाहिली - राजनाथ सिंह
| Updated on: Jun 18, 2022 | 5:27 PM
Share

नवी दिल्ली : देशातील नंबर वन नेटवर्क टीव्ही 9 च्या वतीने ग्लोबल समिटचं (What India Thinks Today) आयोजन करण्यात आले आहे. आज या ग्लोबल समिटचा दुसार दिवस आहे. दुसऱ्या दिवशी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी या ग्लोबल समिटच्या मंचावर संवाद साधला. यावेळी बोलताना राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आपल्या कार्यकाळात आणलेल्या विविध विकास योजना आणि त्यातून आतापर्यंत कसा फायदा झाला, याबाबत माहिती दिली. केंद्र सरकारच्या वतीने मोफत रेशन वाटप योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेवर विरोधकांकडून टीका होत आहे. मोफत स्वस्त धान्य योजनेवर टीका करणाऱ्या विरोधकांवर देखील यावेळी राजनाथ सिंह यांनी निशाणा साधाला आहे. केंद्राकडून लोकांना या योजनेच्या माध्यमातून मोफत धान्य देण्यात येत आहे, ते किती गरजेचं असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

…तोपर्यंत मोफत रेशनची योजना सुरूच राहणार

समिटमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, कोरोना काळात परिस्थिती अत्यंत बिकट बनली होती. अनेक लोक मोठ्या शहरातून गावांकडे निघाले होते. उद्योगधंदे बंद झाले होते. अनेकांनी आपला रोजगार गमवाला होता. हातात पैसा नसल्याने एकवेळच्या जेवणाची चिंता होती. अशा परिस्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संवेदनशिलता अवघ्या जगाने पाहिली. ज्या लोकांना अन्नधान्य नव्हते अशा लोकांसाठी आम्ही मोफत रेशनची व्यवस्था केली. ही स्कीम आजूनही सुरूच आहे. काही लोक मोफत रेशन योजनेचा विरोध करतात. मात्र ही योजना तोपर्यंत चालूच राहिल, जोपर्यंत नागरिक कोरोनामधून पूर्णपणे सावरून स्वत:च्या पायावर उभा राहात नाहीत. ग्रामीण भागातील जनतेचे आणि शेतकऱ्यांचे भविष्य अधिक उज्वल करण्यासाठी गेल्या आठ वर्षांपासून आमचे सरकार काम करत आहे.

देशात डिजिटल क्रांती

पुढे बोलताना राजनाथ सिंह यांनी म्हटले की, देशात डिजिटल क्रांती आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय घेतला आणि तेव्हा पासून डिजिटल आर्थिक व्यवहारांना चालना मिळाली. सध्या स्थितीमध्ये भारतातील जवळपास आठ अब्ज डॉलरपेक्षा अधिक आर्थिक व्यवहार हे डिजिटल माध्यमातून होत आहेत. 2026 पर्यंत देशातील जवळपास 65 टक्के लोक हे डिजिटल व्यवहार करतील अशी अपेक्षा आहे. यासोबतच नागरिकांच्या जनधन खात्याला आधार लिंक करून केंद्र सरकारने सबसिडी दिली. त्यामुळे लोकांना इज ऑफ लिव्हिंगचाही फायदा झाला आहे. गेल्या आठ वर्षांमध्ये स्टार्टअपची संख्या 1400 वरून 70 हजारांवर पोहोचल्याचे देखील त्यांनी म्हटले.

Follow Us
राज्यभर धो धो धो बरसतोय पाऊस! मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीला मोठा
राज्यभर धो धो धो बरसतोय पाऊस! मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीला मोठा फटका; तब्बल 18...
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा