AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

What India Thinks Today : ‘अग्निपथ’ला देशभरातून विरोध; ‘टीव्ही 9’ च्या ग्लोबल समिटमध्ये काय म्हणाले मोदी सरकारमधील पाच मंत्री, वाचा सविस्तर

अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध होत आहे. यावर मोदी सरकारमधील अनेक मंत्र्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. जाणून घेऊयात नेमकं त्यांनी काय म्हटलं?

What India Thinks Today : 'अग्निपथ'ला देशभरातून विरोध; 'टीव्ही 9' च्या ग्लोबल समिटमध्ये काय म्हणाले मोदी सरकारमधील पाच मंत्री, वाचा सविस्तर
| Updated on: Jun 19, 2022 | 1:47 PM
Share

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून तरुणांसाठी ‘अग्निपथ’ योजनेची घोषणा करण्यात आली आहे. मात्र सध्या या योजनेला अनेक राज्यांमधून विरोध होत आहे. तरुण रस्त्यावर उतरलेत. बिहारमध्ये अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना देखील घडल्या आहेत. केंद्र सरकारकडून तरुणांना शांत राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच या योजनेचे फायदे देखील सांगण्यात येत आहेत. टीव्ही 9 च्या वतीने ग्लोबल समिटचे (What India Thinks Today) आयोजन करण्यात आले आहे. या समिटमध्ये देश विदेशातील अनेक नामवंत व्यक्ती सहभागी झाले आहेत. या समिटमध्ये संरक्षमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh), गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah), केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी, अनुराग ठाकूर, स्मृति ईरानी यांच्यासह अनेक मंत्री सहभागी झाले आहेत. समिटमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक नेत्याने अग्निपथ योजनेबाबत आपले मत व्यक्त केले आहे. पाहुयात नेमंक कोण काय काय म्हणाले?

  1. अग्निपथबाबत आपले विचार व्यक्त करताना राजनाथ सिंग यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने सैन्य भरतीसाठी अग्निपथ योजना सुरू केली आहे. ही एक ऐतिहासिक योजना असून, यामुळे सैन्य दलात क्रांती येईल. तसेच हजारो तरुणांना यामाध्यमातून रोजगार मिळेल. मात्र काही लोकांकडून या योजनेबाबत जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात आहे. अफवा पसरवल्या जात आहेत. या अफवांना बळी पडता कामा नये.
  2. अग्निपथबाबत बोलताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे की, रेल्वे ही सर्वसामान्यांची जीवनवाहीनी आहे. ज्या लोकांना विमानाचा खर्च परवडत नाही, त्यांच्यासाठी रेल्वे हाच एक पर्याय असतो. त्यामुळे रेल्वेच्या संपत्तीला नुकसान पोहोचवणे योग्य नाही. येत्या काळात रेल्वे विभागाच्या संपत्तीचे नुकसान करणाऱ्यांविरोधात अधिक कडक कायदा केला जाईल.
  3. अग्निपथ बाबत बोलताना केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटले आहे की, भारत हा लोकशाही देश आहे. इथे प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र हे आंदोलन शांततेच्या मार्गाने होणे गरजेचे आहे. कोणीही कायदा हातात घेऊ नये. तुम्हाला जर जाळपोळ करायचीच असेल तर ती अफवा पसरवणाऱ्यांपासून सुरू करा. कोरोनामुळे गेले दोन वर्ष भरती होऊ शकली नाही. त्यासाठीच केंद्राकडून ही योजना आणण्यात आली आहे.
  4. अग्निपथबाबत बोलताना केंद्रीय मंत्री स्मृती इरानी यांनी म्हटले आहे की, सैन्य सेवेसारखी दुसरी सेवा नाही. सैन्य सेवेला कोणीही पैशात तोलू नये. मी स्वत: जनरल बिपिन रावत यांच्यासोबत काम केले आहे. त्यांनी मला एकदा सांगितले होते की, सैन्यात काम करणे हे खूप कठीण काम आहे. त्याची कधीही पैशांसोबत तुलना होऊ शकत नाही. मी आईच्या नात्याने सर्व तरुणांना आवाहन करते की, देशाच्या संपत्तीचे नुकसान करू नका.
  5. महेंद्र नाथ पांडे यांनी अग्निपथबाबत बोलताना म्हटले आहे की, केंद्राने सैन्यभरतीसाठी मोठ्या विचाराने अग्निपथ योजना तयार केली आहे. या योजनेमुळे जेव्हा तरुण हायस्कूलची तयारी करतात, त्या वयात त्यांना रोजगार मिळणे शक्य होणार आहे. तसेच त्यांच्यामध्ये एक नवे स्कील देखील डेव्हलप होणार आहे.

Follow Us
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.
अशोक खरात प्रकरणात नवनवीन धक्कादायक उलगडा; पत्नी कल्पना खरात फरार?
अशोक खरात प्रकरणात नवनवीन धक्कादायक उलगडा; पत्नी कल्पना खरात फरार?.
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.