AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon : राज्यात मान्सूनचा लहरीपणा कायम, हवामान खात्याच्या ‘यलो अलर्ट’नंतर काय स्थिती?

मान्सूनने महाराष्ट्र व्यापला असे सांगितले जात असले तरी अपेक्षित पावसाची प्रतिक्षा कायम आहे. त्यामुळेच राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील पेरण्या रखडलेल्या आहेत. यासंदर्भात कृषी विभागाने अहवाल सादर केला असून देशात गतरर्षीपेक्षा 22 टक्के कमी क्षेत्रावर पेरण्या झाल्याचे सांगण्यात आले आहे.

Monsoon : राज्यात मान्सूनचा लहरीपणा कायम, हवामान खात्याच्या 'यलो अलर्ट'नंतर काय स्थिती?
वसई-विरार, पालघर जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर
| Edited By: | Updated on: Jun 20, 2022 | 12:18 PM
Share

मुंबई : महाराष्ट्र (Monsoon) मान्सूनने व्यापला असला तरी अपेक्षित बरसत नाही हे स्पष्ट झाले आहे. दोन दिवसांपूर्वीच (Meteorological Department) हवामान विभागाने राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी केला होता. त्यानंतरही विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्वदूर पावसाने हजेरी लावलेली नाही. तुरळक ठिकाणीच मुसळधार पाऊस पडत असल्याने (Marathwada) मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र अद्यापही कोरडाच आहे. सध्या कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मुंबईसह उपनगरामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये याच भागात संततधार सुरु असून अपेक्षित पाऊस नसल्याने मात्र, खरिपातील पेरण्या ह्या रखडलेल्याच आहेत. नैऋत्य मोसमी वाऱ्याने विदर्भाचा काही भाग कव्हर करुन गुजरात आणि मध्य प्रदेशात आगेकूच केली आहे. कोकणासह मुंबई आणि मध्य महाराष्ट्रातही मान्सून प्रगतीपथावर असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

  1. यवतमाळमध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी गेल्या दोन दिवसांपासू ढगाळ वातावरण अन् सोमवारच्या पहाटे पावसाला सुरवात झाली होती. पहाटे 5 च्या दरम्यान यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव, कळंब तालुक्यात विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. सुमारे पाऊण तास हा पाऊस पडला. तर, मारेगाव, बाभूळगाव, या तालुक्यात तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे उकाड्यापासून तर दिलासा मिळाला आहेच पण सोयाबीनच्या पेरणी तर कपाशी लागवड कामाला वेग लागला आहे.
  2. बीडमध्ये 13 गावांचा संपर्क तुटला बीडचा वडवणी तालुक्यातील पुसरा येथील पूल पहिल्याच पावसात वाहून गेलाय, परिणामी 13 गावांचा संपर्क तुटला आहे. रात्री झालेल्या पावसात एक दुचाकीस्वार यात वाहून गेला माञ ग्रामस्थांच्या मदतीने याला वाचविण्यास यश आलंय. मान्सून मध्ये प्रत्येक वर्षी या पुलाची हीच दुरावस्था होते. लोकप्रतिनिधींना सांगून देखील अद्याप हा प्रश्न जैसे थेच आहे.
  3. वसई-विरारमध्ये जोरदार हजेरी वसई- विरारमध्ये पावसाने सातत्य राखले आहे. सलग तीन दिवस पाऊस पडत असून सोमवारी सकाळीच विरार नालासोपारा शहरात जोरदार पावसाला सुरवात झाली होती. परिसरात आभाळ पूर्णता काळकूट झाला असून जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रविवारी सकाळीही पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शहरातील सकल भागात पावसाचे पाणी साचले आहे.
  4. मुंबई उपनगरातही पावसाच्या सरी मुंबईसह उपनगरात पावसाने सातत्य ठेवले आहे. कोकणासह मुंबईत पाऊस सक्रीय झाल्याचे चित्र आहे. हवामान खात्याकडून यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. शिवाय मुसळधार पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणात आगमन झाल्यानंतर मान्सून मुंबईमध्ये चांगलाच बरसत आहे.
  5. खरिपाच्या पेरण्या रखडलेल्याच मान्सूनने महाराष्ट्र व्यापला असे सांगितले जात असले तरी अपेक्षित पावसाची प्रतिक्षा कायम आहे. त्यामुळेच राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील पेरण्या रखडलेल्या आहेत. यासंदर्भात कृषी विभागाने अहवाल सादर केला असून देशात गतरर्षीपेक्षा 22 टक्के कमी क्षेत्रावर पेरण्या झाल्याचे सांगण्यात आले आहे.

हम साथ साथ हैं! पार्थ-रोहित पवार यांची देहबोली काय सांगते?
हम साथ साथ हैं! पार्थ-रोहित पवार यांची देहबोली काय सांगते?.
अजितदादांचा घात की अपघात; संजय राऊतांच्या विधानाचीही चर्चा!
अजितदादांचा घात की अपघात; संजय राऊतांच्या विधानाचीही चर्चा!.
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष.
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना.
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार.
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान.
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान.
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार.
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प.
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात.