AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrayaan-3 update : चंद्रयान-3 नंतर इस्रो चंद्रावर मानव पाठवू शकेल का ? भारताचं गगनयान केव्हा जाणार चंद्रावर ?

चंद्रावर मानव पाठविण्याचा प्रयत्न गेल्या पन्नास वर्षांत कोणीच केलेला नाही. चंद्रावर मानवाला पाठविण्याचे इस्रोचेही लक्ष्य आहे. गगनयान मोहीमेची त्यासाठी तयारी सुरु आहे.

Chandrayaan-3 update : चंद्रयान-3 नंतर इस्रो चंद्रावर मानव पाठवू शकेल का ? भारताचं गगनयान केव्हा जाणार चंद्रावर ?
moon missionImage Credit source: socialmedia
| Updated on: Aug 21, 2023 | 10:06 PM
Share

नवी दिल्ली | 21 ऑगस्ट 2023 : भारताचे चंद्रयान-3 सर्वकाही सुरळीत परिस्थिती असेल तर येत्या 23 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 6.04 वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लॅंड होणार आहे. असं करणारा भारत जगातला पहीला देश ठरणार आहे. कारण दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅंडींग करण्याचे धाडस आतापर्यंत कोणी केलेले नाही. या क्षणाची अब्जावधी भारतीय वाट पहात आहेत. रशियाच्या लूना-25 या यानाने हा प्रयत्न केला होता, पण ते शनिवारी चंद्राच्या कक्षेतच क्रॅश झाले आहे. परंतू चंद्रयान-3 नंतर चंद्रयान-4 मध्ये इस्रो चंद्रावर मानव पाठविण्याची तयारी करु शकतो का ? याविषयी उत्सुकता वाढली आहे.

चंद्रावर मानव पाठविण्याचा प्रयत्न गेल्या पन्नास वर्षांत कोणीच केलेला नाही. चंद्रावर किंवा मंगळावर मानवनिर्मित उपग्रह पाठविण्यातच अनेक अडचणी असतात. तेथील गुरुत्वाकर्षण कक्षेत प्रवेश करणे अवघड आहे. हे इतके अवघड आहे की अमेरिका आणि रशियाच्या सलग 14 चंद्र मोहीमांना अपयश आले, नंतर 15 व्या मोहीमेत यश मिळाले. या मानाने चंद्रयान-1 मोहीम त्यामानाने यशस्वी ठरली आहे. इस्रोनेच्या पहील्याच चंद्रयान-1 मोहीमेने चंद्राचा अभ्यास करीत तेथे बर्फाच्या स्वरुपात पाणी असल्याचे शोधले होते.

आतापर्यंतच्या मानवी मोहीमा 

अमेरिकेच्या नासाने अपोलो-11 मोहिमेत चंद्रावर 21 जुलै 1969 मध्ये नील आर्मस्ट्रॉंग, मायकल कॉलिन्स आणि बज आल्ड्रीन या तीन अंतराळवीरांना पाठविण्यात यश मिळविले होते. त्यातील नील यांनी चंद्रावर पहीले पाऊल ठेवले तर पाठोपाठ मायकल उतरले, तर बज चंद्राच्या कक्षेत यान उडवित राहीले. त्यानंतर 14 नोव्हेंबर 1969 अपोलो-12 मोहीमेत तीन अंतराळवीरांना धाडले. त्यानंतर 7 डिसेंबर 1972 रोजी अपोलो- 17 मोहीमेत अखेरचे तीन मानव चंद्रावर गेले. तीन वर्षांत अमेरिकेचे 12 अंतराळवीर चंद्रावर जाऊन आले. यात अनेकदा अपयश आले. 21 फेब्रुवारी 1967 मध्ये अपोलो-1 प्रक्षेपणावेळी स्फोट होऊन दोन अंतराळवीरासह 27 जणांचा मृत्यू झाला.

चंद्रयान मोहीमेचा इतिहास

इस्रोला केवळ चंद्रावर रोव्हर आणि लॅंडर पाठविण्याचा उद्देश्य नसून चंद्रावर मानव पाठविण्यासाठी भारताची गगनयान मोहीम राबविली जाणार आहे. परंतू चंद्रावर मानव पाठविणे एवढे सोपे नाही. म्हणून हळूहळू चंद्र मोहीमेत अनेक टप्पे पूर्ण करीत आहे. चंद्रयान-1 मध्ये ऑर्बिटर आणि मून इम्पॅक्ट प्रोब लॉंच केला, चंद्रयान-2 मध्ये ऑर्बिटरसोबत लॅंडर आणि रोव्हर पाठविला. तर चंद्रयान-3 मध्ये केवळ लॅंडर आणि रोव्हर पाठविला आहे. चंद्रयान-3 च्या यशानंतर चंद्रयान-4 च्या मोहीम होईल. त्यात यश आल्यानंतर मानव पाठविण्याबाबत विचार होईल, त्यासाठी अधिक शक्तीशाली रॉकेटची गरज लागेल.

राकेश शर्मा यांचा इतिहास

भारताचे राकेश शर्मा रशियाच्या सोयूज टी-11 मधून 3 एप्रिल 1984 रोजी अंतराळात आठ दिवस राहण्याचा विक्रम केला आहे. गगनयान मोहीमेत तीन अंतराळवीरांना पृथ्वीपासून 400 किमी उंचीवर पोहचून तीन दिवसांचा थांबा देऊन त्यांना सुखरुप परत आणण्याची योजना आहे.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा