AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WITT: देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकासाचा नवा अध्याय लिहीत आहे – डॉ. रामेश्वर राव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत विकासाचा एक नवा अध्याय लिहीत आहे. पंतप्रधान मोदींच्या डिजिटल इंडियाच्या दृष्टिकोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी चालना मिळाली आहे, असं माय होम्स ग्रुपचे चेअरमन डॉ. रामेश्वर राव यांनी म्हटलं आहे.

WITT: देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकासाचा नवा अध्याय लिहीत आहे - डॉ. रामेश्वर राव
| Updated on: Mar 28, 2025 | 7:24 PM
Share

टिव्ही 9 नेटवर्कचा मेगा ईव्हेट असलेल्या व्हाट इंडिया थिंक्स टुडे (What India Thinks Today) या कार्यक्रमाला आज दिल्लीमध्ये सुरुवात झाली. हा दोन दिवसांचा कार्यक्रम असणार आहे. भारत मंडपममध्ये हा कार्यक्रम सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी माय होम्स ग्रुपचे चेअरमन डॉ. रामेश्वर राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत केलं.

या कार्यक्रमात बोलताना डॉ.रामेश्वर राव यांनी म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत विकासाचा एक नवा अध्याय लिहीत आहे. पंतप्रधान मोदींच्या डिजिटल इंडियाच्या दृष्टिकोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी चालना मिळाली आहे. आज संकट काळात संपूर्ण जग भारताकडे मोठ्या आशेनं पाहत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सर्वसमावेशक विकासाचं स्वप्न आणि युद्ध हा पर्यायच नसलेलं जग निर्माण करण्याचा त्यांचा संकल्प सध्याच्या परिस्थितीमध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आज आपला देश मार्गदर्शकाची भूमिका बजावत आहे, असं माय होम्स ग्रुपचे चेअरमन डॉ. रामेश्वर राव यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, 1.45 अब्ज लोकांच्या स्वप्नांना पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पद्धतीनं दिशा देत आहेत. ज्या पद्धतीनं भारत जागतिक विकासाचा प्रमुख चालक बनत आहे, ते पाहून एक तरुण उद्योजक म्हणून मी खूप प्रेरित झालो आहे. जागतिक बँक आणि आयएमएफ देखील आज भारताच्या विकासाची, प्रगतिची कबुली देत आहे. मोदी सरकारने केवळ आर्थिक आघाडीवर भारताला स्थिर बनवलं नाही तर जगाला स्थिरता आणि विकासाचं एक नवं मॉडेल देखील दिलं आहे, असंही यावेळी रामेश्वर राव यांनी म्हटलं आहे.

डिजिटल इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी मोदीजी प्रयत्न करत आहेत. त्यांचे हे प्रयत्न इतक्या वेगानं यशस्वी होत आहेत की, आता काही विकसित देशही ते स्वीकारण्यासाठी उत्सुक आहेत. आपले कौशल्य वाढवण्याची हीच योग्य वेळ असल्याचंही यावेळी रामेश्वर राव यांनी म्हटलं आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.