AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad pawar : पंतप्रधान पदावरून फडवीसांनी पवारांना डिवचले, फडणवीसांच्या टीकेनंतर चमत्कार घडतो-मविआ

10 खासदारही निवडून आणता आले नाही, मात्र पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहणं चूक नाही असा खोचक टोला फडणवीसांनी पवारांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच लगावला आणि राष्ट्रवादी-शिवसेनेनं तात्काळ पलटवार केला.

Sharad pawar : पंतप्रधान पदावरून फडवीसांनी पवारांना डिवचले, फडणवीसांच्या टीकेनंतर चमत्कार घडतो-मविआ
देवेंद्र फडणवीस, शरद पवार
| Edited By: | Updated on: Dec 13, 2021 | 9:48 PM
Share

मुंबई : राज्यात सध्या भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रोज कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून रंगताना दिसून येत आहे. कधी संजय राऊतांचं वक्तव्य तर कधी भाजपने केलेली टीका, तर आशिष शेलार विरुद्ध मुंबईच्या महापौर अशा अनेक मुद्द्यावरून रोज एकमेकांवर टीका होताना दिसाते आहे. मात्र आता जो सामना रंगलाय तो थेट, फडणवीसांनी शरद पवारांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून, 10 खासदारही निवडून आणता आले नाही, मात्र पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहणं चूक नाही असा खोचक टोला फडणवीसांनी पवारांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच लगावला आणि राष्ट्रवादी-शिवसेनेनं तात्काळ पलटवार केला. त्यामुळे पुन्हा राज्यातले राजकारण तापलंय.

फडणवीसांना राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर

विधानसभेच्या प्रचारावेळीही पवार-फडणवीस सामना

फडणवीस अधूनमधून पवारांना टार्गेट करतच असतात. 2019च्या विधानसभा निवडणुकीतल्या प्रचारात पवार आणि फडणवीसांमध्येच पैलवानावरुन सामना रंगला होता. 2019 च्या विधानसभेच्या निकालात भाजप 105 आमदारांसह सर्वात मोठा पक्ष ठरला. पण पवारांनी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला फिट करुन, फडणवीसांना झटका दिला. त्यामुळं राष्ट्रवादी आता दिल्लीत चमत्काराची अपेक्षा करतेय.

राज ठाकरेंकडून पवारांचं कौतुक

फडणवीसांनी पवारांना वाढदिवसाच्या दिवशी टोला लगावला असला, तरी राज ठाकरेंनी मात्र पवारांचं कौतुक केलंय. राजकीय खेळी करण्यात शरद पवार माहिर आहेत. 2024 मध्ये मोदींना टक्कर देण्यासाठी विरोधकांची मोट बांधण्यासाठी पवारही प्रयत्न करतच असतात. त्यामुळं पवार भाजपच्या निशाण्यावर येणं हे स्वाभाविक आहे. साताऱ्यातल्या पावसातल्या सभेने जणू राष्ट्रवादीवर राज्यात मतांचा पाऊस पाडला आणि त्यानंतर महाविकास आघाडीची गाठ बांधून ठाकरे सरकार स्थापन झाल्यावर देशाचे डोळे महाराष्ट्राच्या राजकारणाकडे लागले. काण जे कुणालाही जमले नाही, त्या भाजपला शह देत पवारांनी राज्यात सरकार बसवले.

Beed : आमदार सुरेश धस यांच्याविरोधात ईडीकडे तक्रार दाखल, काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

Water supply : मुंबई, ठाण्याच्या काही भागात दोन दिवस पाणीपुरवठा बंद, वाचा सविस्तर

kareena kapoor : करीना कपूरचे घर बीएमसीकडून सील, नियमभंगाप्रकरणी कोणती कारवाई होणार? वाचा सविस्तर

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.