ब्रेकअप झालेल्या तरुणांचं प्रचंड आवडतं गाणं, 90 च्या दशकापासून ट्रेंडमध्ये, आजही ऐकतात तरुण

90 च्या दशकातील 4 मिनिट 43 सेकंदाचं गाणं, जे प्रत्येक ब्रेकअप झालेल्या तरुणांचं होतं आवडतं. आजही प्रत्येकजण ब्रेकअप झालं की हे गाणं ऐकतो.

| Updated on: Jun 07, 2026 | 11:14 AM
1 / 5
1990 च्या दशकात अनेक गायकांनी आपल्या वेगळ्या शैलीमुळे संगीतविश्वात खास स्थान निर्माण केले. त्यापैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे अल्ताफ राजा. त्यांच्या आवाजातील वेदना, साधेपणा आणि भावनिक सादरीकरणामुळे त्यांनी लाखो श्रोत्यांच्या मनात घर केले.

1990 च्या दशकात अनेक गायकांनी आपल्या वेगळ्या शैलीमुळे संगीतविश्वात खास स्थान निर्माण केले. त्यापैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे अल्ताफ राजा. त्यांच्या आवाजातील वेदना, साधेपणा आणि भावनिक सादरीकरणामुळे त्यांनी लाखो श्रोत्यांच्या मनात घर केले.

2 / 5
त्यांच्या गाण्यांची लोकप्रियता प्रचंड होती. त्या काळात त्यांच्या गाण्यांच्या कॅसेट्स आणि सीडींची विक्रीही विक्रमी झाली होती. आजही सोशल मीडियावर त्यांचे चाहते मोठ्या संख्येने सक्रिय असून त्यांच्या गाण्यांना तितकाच प्रतिसाद देताना दिसतात.

त्यांच्या गाण्यांची लोकप्रियता प्रचंड होती. त्या काळात त्यांच्या गाण्यांच्या कॅसेट्स आणि सीडींची विक्रीही विक्रमी झाली होती. आजही सोशल मीडियावर त्यांचे चाहते मोठ्या संख्येने सक्रिय असून त्यांच्या गाण्यांना तितकाच प्रतिसाद देताना दिसतात.

3 / 5
90 च्या दशकात प्रेम, विरह आणि तुटलेल्या नात्यांच्या भावना ज्या काही गाण्यांनी अत्यंत प्रभावीपणे व्यक्त केल्या, त्यामध्ये अल्ताफ राजांचे ‘पहले तो कभी-कभी गम था’ हे गाणे विशेष ठरते. हे केवळ एक गाणे नाही तर ब्रेकअपचा सामना करणाऱ्या असंख्य तरुणांच्या भावनांना आवाज देणारे गीत होते.

90 च्या दशकात प्रेम, विरह आणि तुटलेल्या नात्यांच्या भावना ज्या काही गाण्यांनी अत्यंत प्रभावीपणे व्यक्त केल्या, त्यामध्ये अल्ताफ राजांचे ‘पहले तो कभी-कभी गम था’ हे गाणे विशेष ठरते. हे केवळ एक गाणे नाही तर ब्रेकअपचा सामना करणाऱ्या असंख्य तरुणांच्या भावनांना आवाज देणारे गीत होते.

4 / 5
अल्ताफ राजांच्या भारावलेल्या आणि वेदनांनी भरलेल्या आवाजाने, भावस्पर्शी शब्दांनी आणि हळव्या संगीताने हे गाणे थेट श्रोत्यांच्या हृदयापर्यंत पोहोचले. काळ बदलला, संगीताची शैली बदलली, पण या गाण्याची लोकप्रियता मात्र कमी झाली नाही.

अल्ताफ राजांच्या भारावलेल्या आणि वेदनांनी भरलेल्या आवाजाने, भावस्पर्शी शब्दांनी आणि हळव्या संगीताने हे गाणे थेट श्रोत्यांच्या हृदयापर्यंत पोहोचले. काळ बदलला, संगीताची शैली बदलली, पण या गाण्याची लोकप्रियता मात्र कमी झाली नाही.

5 / 5
आजही ‘पहले तो कभी-कभी गम था’ हे गाणे 90 च्या दशकातील सर्वाधिक लोकप्रिय आणि भावनिक गाण्यांपैकी एक मानले जाते. काळ बदलला असला तरी या गाण्याची जादू आणि अल्ताफ राजांचा आवाज संगीतप्रेमींच्या मनात कायम जिवंत आहे.

आजही ‘पहले तो कभी-कभी गम था’ हे गाणे 90 च्या दशकातील सर्वाधिक लोकप्रिय आणि भावनिक गाण्यांपैकी एक मानले जाते. काळ बदलला असला तरी या गाण्याची जादू आणि अल्ताफ राजांचा आवाज संगीतप्रेमींच्या मनात कायम जिवंत आहे.

Follow Us