6 मिनिट 46 सेकंदाचं गाणं, जे लोक पुन्हा-पुन्हा ऐकत आहेत, ज्यामधील हेमा मालिनीच्या सौंदर्यावर फिदा झालेले लोक
6 मिनिट 46 सेकंदाचं ते सर्वात सुंदर गाणं, 51 वर्षानंतरही पुन्हा-पुन्हा ऐकतात लोक. हेमा मालिनी यांच्या सौंदर्यावर फिदा झालेले लोक.

1970 चं दशक हिंदी चित्रपटसृष्टी आणि संगीतासाठी सुवर्णकाळ मानलं जातं. त्या काळातील गाणी ही फक्त ऐकण्यासाठी नसून ती थेट मनाला भिडणारी असायची. कुटुंब, नाती, प्रेम आणि विरह अशा भावना अत्यंत साध्या आणि प्रभावी पद्धतीने मांडल्या जात.

कमी वाद्यसंगीत, साधेपणा आणि भावनिक ताकद यामुळे ही गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. रेडिओ आणि कॅसेटच्या माध्यमातून प्रत्येक घरात पोहोचलेली ही गाणी आजही लोकांच्या आठवणींना उजाळा देतात.

भारतीय संस्कृतीत मुलीच्या लग्नानंतरच्या ‘विदाई’ क्षणाला विशेष भावनिक महत्त्व आहे. हा क्षण शब्दांत मांडणं कठीण असलं तरी जुन्या काळातील गीतकारांनी तो अतिशय सहज आणि प्रामाणिकपणे सादर केला. या गाण्यांमध्ये कोणताही दिखावा नसून, मनापासून व्यक्त झालेल्या भावना असतात. त्यामुळे अशी गाणी ऐकताना अनेकदा डोळे नकळत पाणावतात.

याच पार्श्वभूमीवर 1975 साली प्रदर्शित झालेल्या 'खुशबू' या चित्रपटातील ‘घर जाएगी तर जाएगी’ हे गाणं विशेष ठरतं. हे गाणं प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी आपल्या मधुर आणि भावपूर्ण आवाजात सादर केलं आहे. या गाण्याचं संगीत आर. डी. बर्मन यांनी दिलं असून, हृदयस्पर्शी शब्द गुलजार यांनी लिहिले आहेत.

या गाण्याची खरी ताकद म्हणजे त्याची साधी मांडणी आणि भावनिक खोली. एका नववधूच्या विदाईचा क्षण अतिशय निरागस आणि वास्तववादी पद्धतीने यात दाखवण्यात आला आहे जो प्रत्येकाला आपल्या आयुष्यातील एखाद्या खास क्षणाची आठवण करून देतो.