इतकं सुंदर गाणं की एकदा ऐकलं तरी दिवसभर गुणगुणतात लोक, 56 वर्षानंतरही क्रेझ कायम

3 मिनिट 49 सेकंदाचं प्रचंड रोमँटिक गाणं, जे गेल्या 56 वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर करत आहे राज्य. आजही ऐकदा ऐकलं तरी दिवसभर त्याच गाण्यात रमून जातात लोक.

| Updated on: Jun 07, 2026 | 12:24 PM
1 / 5
1970 चे दशक हे हिंदी चित्रपटसृष्टीतील रोमँटिक गाण्यांचे सुवर्णयुग मानले जाते. त्या काळातील गाण्यांमध्ये असलेली साधी, भावस्पर्शी आणि मनाला भिडणारी शब्दरचना आजही रसिकांना मोहून टाकते. रेडिओ आणि ऑडिओ कॅसेटच्या माध्यमातून ही गाणी घराघरांत पोहोचली आणि अनेकांच्या आठवणींचा अविभाज्य भाग बनली.

1970 चे दशक हे हिंदी चित्रपटसृष्टीतील रोमँटिक गाण्यांचे सुवर्णयुग मानले जाते. त्या काळातील गाण्यांमध्ये असलेली साधी, भावस्पर्शी आणि मनाला भिडणारी शब्दरचना आजही रसिकांना मोहून टाकते. रेडिओ आणि ऑडिओ कॅसेटच्या माध्यमातून ही गाणी घराघरांत पोहोचली आणि अनेकांच्या आठवणींचा अविभाज्य भाग बनली.

2 / 5

अशाच अजरामर गाण्यांंपैकी एक म्हणजे 1970 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हीर रांझा’ चित्रपटातील ‘मिलो ना तुम तो हम घबराए’ हे गाणे. लता मंगेशकर यांच्या मधुर आवाजाने सजलेले हे गाणं आजही श्रोत्यांच्या मनात विशेष स्थान राखून आहे.

3 / 5

या गाण्याचे संगीत ज्येष्ठ संगीतकार मदन मोहन यांनी दिले असून, गीतकार कैफी आजमी यांनी त्याचे शब्द लिहिले आहेत. प्रेम, विरह, ओढ आणि भेटीची आस यांचे सुंदर चित्रण या गाण्यातून करण्यात आले आहे. त्यामुळे हे गाणे काळाच्या ओघातही तितकेच लोकप्रिय राहिले आहे.

4 / 5

चित्रपटात हे गाणे राज कुमार आणि प्रिया राजवंश यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. त्यांच्या प्रभावी अभिनयामुळे आणि पडद्यावरील सुंदर केमिस्ट्रीमुळे या गाण्याची मोहकता अधिकच वाढली.

5 / 5

आजच्या डिजिटल युगातही या गाण्याची लोकप्रियता कायम असून यूट्यूबवरील विविध व्हिडिओंना लाखो ते कोट्यवधी प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. त्यामुळे हे गाणे आजही रोमँटिक प्लेलिस्टचा महत्त्वाचा भाग मानले जाते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us