अक्षय कुमार आणि कियारा आडवाणी या मोहिमेच्या माध्यमातून किन्नर समुदायाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत.
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार त्याच्या बहुचर्चित 'लक्ष्मी' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
आता या चित्रपटातील 'अब हमारी बारी है' हे गाणं रिलीज झालं आहे. हे गाणं कविता स्वरुपात आहे.
या गाण्याच्या माध्यमातून लोकांचा दृष्टीकोन बदलण्याचा प्रयत्न अक्षय कुमार आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमनं केला आहे.
हे गाणं अक्षय कुमारनं स्वत: त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलं आहे.