जेन झींना ‘गटर छाप’ म्हणणाऱ्या कंगना स्वतः किती शिकल्यात? सोशल मीडियावर उडवली जातेय खिल्ली
सीजेपीच्या आंदोलनानंतर अभिनेत्री आणि भाजपच्या महिला खासदार यांनी जेन झींबद्दल वादग्रस्त वाक्तव्य केलं. ज्यामुळे कंगना वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहे. अशात विद्यार्थ्यांना 'गटर छाप' म्हणणाऱ्या कंगना यांचं देखील शिक्षण देखील समोर आलं आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडवली जात आहे...

- नीट (NEET) पेपरफुटी विरोधात जंतरमंतर येथे झालेल्या आंदोलनावर कंगना राणौत यांनी नुकताच भाष्य केलं आणि त्यांच्या या विधानांवरून अभिनेत्रीवर जोरदार टीका देखील होत आहे. चित्रपट कारकिर्दीव्यतिरिक्त कंगना राष्ट्रीय राजकारणातही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
- कंगना यांनी 2024 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आणि हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकल्या. पण आंदोलनादरम्यान तरुणांनी केलेल्या काही टिप्पण्यांची कंगना यांनी कडक शब्दांत टीका केली. तेव्हापासून, कंगना यांना जेन झी आणि सोशल मीडियावरील इतर अनेक लोकांकडूनही तीव्र टीकेचा सामना करावा लागत आहे.
- सांगायचं झालं तर, 23 मार्च 1987 रोजी हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील ‘भांबला’ येथील एका राजपूत कुटुंबात जन्मलेल्या कंगना यांनी चंदीगडमधील सेक्टर 15-A येथील ‘डीएव्ही मॉडेल स्कूल’मध्ये शालेय शिक्षण पूर्ण केलं.
- समोर येत असलेल्या माहितीनुसार, कंगना यांनी फक्त बारावीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. कंगना यांच्या पालकांची इच्छा होती की त्यांनी डॉक्टर बनावं आणि त्यांचं देखील ते स्वप्न पूर्ण करण्याची आकांक्षा होती. कंगनाची आई, आशा राणौत, या स्वतः एक शिक्षिका होत्या. पण कंगना यांनी अभिनय विश्वात पदार्पण केलं.
- कंगना यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, ही पहिली वेळ नाही, जेव्हा कंगना त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहे. याआधी देखील त्यांनी अनेक मुद्द्यांवर सडेतोड वक्तव्य करत वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहे. आता देखील कंगना त्यांच्या विधानामुळेच वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us