पुन्हा लॉकडाऊनचे दिवस, आता IPL चे सगळे सामने प्रेक्षकांविना? मोठी अपडेट समोर!

चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ब्रिजेश गोयल यांनी मोठी मागणी केली आहे. त्यांनी आयपीएलचे उर्वरित सामने प्रेक्षकांशिवाय आयोजित करावेत, अशी मागणी केली आहे.

| Updated on: May 17, 2026 | 10:03 PM
1 / 5
चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ब्रिजेश गोयल यांनी मोठी मागणी केली आहे. त्यांनी आयपीएलचे उर्वरित सामने प्रेक्षकांशिवाय आयोजित करावेत, अशी मागणी केली आहे. त्यांनी केलेल्या या मागणीची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.

चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ब्रिजेश गोयल यांनी मोठी मागणी केली आहे. त्यांनी आयपीएलचे उर्वरित सामने प्रेक्षकांशिवाय आयोजित करावेत, अशी मागणी केली आहे. त्यांनी केलेल्या या मागणीची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.

2 / 5
सोबतच त्यांनी मर्यादित स्टेडियममध्ये सामन्यांचे आयोजन करावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे. या मागण्यांचे पत्र त्यांनी क्रीडामंत्री मनुख मांडवीय यांना लिहिले आहे.

सोबतच त्यांनी मर्यादित स्टेडियममध्ये सामन्यांचे आयोजन करावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे. या मागण्यांचे पत्र त्यांनी क्रीडामंत्री मनुख मांडवीय यांना लिहिले आहे.

3 / 5
आयपीएलच्या सामन्यांसाठी संघाने हवाई मार्गाने तसेच रस्त्याने लाखो किलोमीटर प्रवास केला. या हवाई प्रवासामुळे भारत सरकारवर अतिरिक्त दबाव येऊ शकतो, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळेच उर्वरित आयपीएलचे सामने प्रेक्षकांशिवाय आयोजित करावेत, असेही ते या पत्रात म्हणाले आहेत.

आयपीएलच्या सामन्यांसाठी संघाने हवाई मार्गाने तसेच रस्त्याने लाखो किलोमीटर प्रवास केला. या हवाई प्रवासामुळे भारत सरकारवर अतिरिक्त दबाव येऊ शकतो, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळेच उर्वरित आयपीएलचे सामने प्रेक्षकांशिवाय आयोजित करावेत, असेही ते या पत्रात म्हणाले आहेत.

4 / 5
आयपीएलच्या एका सामन्याला सरासारी 50 हजार प्रेक्षक उपस्थित असतात. या प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्यासाठी हजारो लिटर पेट्रोल, डिझेल लागते. प्रेक्षकांशिवाय आयपीएल आयोजित केल्यास तेवढ्या इंधनाची बचत होऊ शकते, असा तर्कही त्यांनी या पत्रात लावला आहे.

आयपीएलच्या एका सामन्याला सरासारी 50 हजार प्रेक्षक उपस्थित असतात. या प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्यासाठी हजारो लिटर पेट्रोल, डिझेल लागते. प्रेक्षकांशिवाय आयपीएल आयोजित केल्यास तेवढ्या इंधनाची बचत होऊ शकते, असा तर्कही त्यांनी या पत्रात लावला आहे.

5 / 5
दरम्यान, आता ब्रिजेश गोयल यांनी क्रीडामंत्र्यांकडे केलेल्या या मागणीचा केंद्र सरकार किती गांभीर्याने विचार करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच ही मागणी मान्य झाल्यास आयपीएलचे उर्वरित सामने खरंच प्रेक्षकांविना आयोजित केले जाणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

दरम्यान, आता ब्रिजेश गोयल यांनी क्रीडामंत्र्यांकडे केलेल्या या मागणीचा केंद्र सरकार किती गांभीर्याने विचार करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच ही मागणी मान्य झाल्यास आयपीएलचे उर्वरित सामने खरंच प्रेक्षकांविना आयोजित केले जाणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Follow Us