Chilli Crops: अस्सल देशी उपाय… इतक्या मिरच्या की झाडच वाकणार… कमी खर्चात उत्पादन डबल, कीड आणि रोग बंधार्यावरच थांबणार
Chilli Crops Pests and Disease Control: मिरचीची लागवडीत पान आकसणे, फुल गळणे आणि विविध किडींच्या प्रादुर्भावाचा सामना करावा लागतो. त्यामुळे मिरीचीचे उत्पादन घटते. त्यावर अस्सल देशी, पारंपारिक उपाय केल्यास कमी खर्चात उत्पादन दुप्पट होईल. कीड आणि रोगावर नियंत्रण येईल.

तुरटीचा रामबाण उपाय: कोकडा, मरोडिया हा रोग मिरचीवर दिसतो. पांढऱ्या माशीमुळे हा रोग होतो. हिवाळ्यात त्याचा प्रभाव दिसतो. तुरटीचा उपाय या रोगावर रामबाण उपाय ठरतो. झाडापासून 5 फूट अंतरावर 2 इंच खोल खड्डा खणून त्यात तुरटी ठेवा. पाणी दिल्याने तुरटी विरघळते. रोपाला रोगापासून संरक्षण मिळते. उत्पादन वाढते.

शेळीचे दूध: शेळी रानावनात चरते. विविध औषधी वनस्पती खाते. तिचे दूध अनेक आजारावर अक्सर इलाज म्हणून ओळखले जाते. तसेच मरोडिया, कोकडा रोगावर शेळीचे दूध जालीम उपाय आहे. या रोगामुळे मिरचीची फुले गळतात. सकाळी मिरचीच्या झाडावर किंचित प्रमाणात शेळीचे दूध फवारल्यास रोग कमी होतो. उत्पादन वाढते.

गुग्गुळाचा दमदार उपाय: रोजच्या पूजेत, सण उत्सवाच्या काळात गुग्गुळ निखाऱ्यावर टाकून घरभर पसरवला जातो. त्यामुळे वातावरण एकदम प्रसन्न होते. त्याच्या सुंगधाने ताजतवानं वाटतं. शेतातही हा प्रयोग केल्यास फायदा होतो. एका मोठ्या लोखंडी टोपल्यात अथवा भांड्यात चांगला आहार करून त्यात गुग्गुळ वरतून टाकल्यास धूर होईल आणि पिकांवरील कीड आणि रोग पळून जाईल. प्रत्येक सरीत ही धुणी द्या. पिकाची जोमात वाढ होईल आणि उत्पादन वाढेल.

गोमूत्र-ताकाची फवारणी: 5 लिटर गोमूत्र आणि 6 लिटर आंबट ताक यांचे चांगले मिश्रण करा. हे मिश्रण पिकांवर फवारा. 8 ते 10 दिवसात मिरचीवरील रोग कमी झाल्याचे दिसेल. कोकडासह इतर कीड कमी होईल.

चुना अथवा रॉकेलचा उपाय: मिरची, वांगी आणि टोमॅटो या पिकांमध्ये पाने आकसतात. पाणी देताना त्या पाण्यात अगदी किंचित रॉकेल टाका. थोड्यावेळाने पिकावर कमी प्रमाणात चुना शिंपडा. तीन दिवसांच्या अंतराने ही प्रक्रिया केल्यास फायदा होऊ शकतो.

फुले नाही गळणार: 50 ग्रॅम हिंग आणि 500 ग्रॅम जुन्या बाजारीचे पीठ एकत्र करा. त्याची एक पिशवी तयार करा आणि पाणी देताना ती दांडात ठेवा. या उपायामुळे फुले गळण्याची समस्या कमी होईल. कीड आणि रोग नियंत्रीत राहील.