
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ईशा कोप्पीकर बऱ्याच काळापासून चित्रपट सृष्टीपासून लांब आहे. ईशा बॉलिवूडमध्ये खल्लास गर्ल म्हणून ओळखली जाते. रामगोपाल वर्माच्या 'कंपनी' चित्रपटातील खल्लास हे तिच आयटम साँग खूप गाजलं होतं.

सध्या ईशा कोप्पीकर पुन्हा चर्चेत आहे. 29 वर्षानंतर तिने इंडस्ट्री संदर्भात काही मोठ धक्कादायक खुलासे केले आहेत. ‘इश्क समुंदर’ आणि ‘खल्लास’ सारख्या गाण्यांसाठी आजही ईशा कोप्पीकरची आठवण काढली जाते.

ईशा कोप्पीकर Me Too बद्दलही मोकळेपणाने बोलली. मी टू मध्ये सत्य आहे. संस्कारांवर तुमचा विश्वास असेल, तर इंडस्ट्रीमध्ये तुमच टिकण कठीण आहे असं ती म्हणाली.

अनेक मुली अशा सुद्धा आहेत, ज्यांनी कास्टिंग काऊचच्या भीतीने इंडस्ट्री सोडली. तिथे मुलींना सांगितलं जातं की, आमच ऐका, नाही तर हार माना. इंडस्ट्रीमध्ये असे कमीच लोक आहेत, ज्यांनी हार मानली नाही, मी त्या पैकीच एक आहे असं ईशा म्हणाली.

कास्टिंग काऊचबद्दल ईशा म्हणाला की, "अनेक डायरेक्टर आणि प्रोड्यूसर भेटायला बोलवायचे. चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचे. ते लोक हात दाबून सांगायचे की, हिरोशी मैत्री करावी लागेल"

एकवेळ इंडस्ट्रीमधल्या एका मोठ्या हिरोने मला एकटीला भेटायला बोलावल होतं. ड्रायव्हरलाही सोबत आणू नको, असं त्याने सांगितलेलं. बॉलिवूडमध्ये टिकून रहायच असेल, तर सर्वांशी मिळून मिसळून रहाव लागेल असं त्या मोठ्या हिरोने म्हटलं होतं.