Photo : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत वटपौर्णिमेचा सण साजरा, पाहा सुंदर फोटो
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत वटपौर्णिमेचा सण साजरा करण्यात आला. (Vat Purnima in 'Sukh Mhanje nakki Kay Asta' Serial)

वरुणराजाचं आगमन झालं की स्त्रियांना आतुरता असते ती वटपौर्णिमा या सणाची. वडाची पूजा करुन पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करणं हा या सणाचा महत्त्वाचा उद्देश मानला जातो.

हा सण नेहमीच आपल्याला निसर्गाच्या जवळ येण्यासाठी भाग पाडतो. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत वटपौर्णिमेचा सण साजरा करण्यात आला.

या सणाचे अनेक वैज्ञानिक फायदे आहेत. त्यातील एक म्हणजे वडाचं झाड ऑक्सिजनचा पुरवठा करणारी निसर्गाची देणगी आहे असं म्हटलं जातं. सध्याच्या घडीला आपल्या प्रत्येकालाच या ऑक्सिजनचं महत्त्व चांगलंच पटलेलं आहे.

त्यामुळेच वटपौर्णिमेच्या सणाला वडाच्या झाडाची पूजा केली जाते. या पुजनाला प्रचंड मोठं महत्त्व आहे.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत गौरीची पहिलीच वटपौर्णिमा असल्यामुळे विशेष उत्साह पाहायला मिळाला.

शिर्केपाटील कुटुंबाने एकत्र येत हा सण साजरा केला.

वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात.