
दिल्लीतील पाण्यासंदर्भात आता गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दिल्लीचे पाणी पुरवठा मंत्री आतिशी यांनी सांगितले की, हरियाणा त्यांच्या वाटेतील पाणी सोडत नाही. यामुळे दिल्लीत जलसंकट निर्माण झाले आहे.

दिल्लीचे पाणी पुरवठा मंत्री आतिशी यांच्या दाव्यानुसार, हरियाणा आणि दिल्लीत करार झाला आहे. त्या करारानुसार हरियाणातील मुनक तलावाच्या माध्यमातून दिल्लीला 1050 क्यूसेक पाणी सोडावे.

मुनक तलावातील पाण्याची चोरी होत असल्याच्या बातम्या आल्या आहे. त्यानंतर आम आदमी पक्ष आक्रमक झाला आहे. दिल्ली सरकार जलमाफियांसोबत पाणी चोरत असल्याचा आरोप 'आप'ने केला आहे.

आम आदमी पक्षाने या संदर्भात त्यांनी दिल्लीच्या राज्यपालांना पत्र लिहिले आहे. त्यात हरियाणा दिल्लीला त्यांच्या हक्काचे पाणी सोडत नसल्याचे म्हटले आहे.

राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात आतिशी यांनी म्हटले आहे की, जानेवारी 2023 मध्ये दिल्ली जलबोर्डने 1179 टँकर शहरात सुरु केले होते. जून 2023 मध्ये या टँकरची संख्या 1203 झाली. आता पाणी चोरी थांबवण्यासाठी मुनक तलावावर बंदोबस्त लावण्याची मागणी केली आहे.