इतकं सुंदर गाणं की पुन्हा-पुन्हा ऐकलं तर मन भरत नाही, 7 महिन्यांपासून ट्रेंडमध्ये, ठरलं नंबर-1
गेल्या 7 महिन्यांपासून सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे गाणं, एतकं सुंदर की पुन्हा-पुन्हा ऐकलं तरी भरत नाही मन. ठरलं लोकप्रियतेमध्ये नंबर 1.

बॉलिवूडमधील अनेक गाणी प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवस लोकप्रिय राहतात तर काही गाणी अनेक महिने प्रेक्षकांच्या पसंतीची ठरतात. नुकतीच ऑर्मेक्स मीडियाने सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या गाण्यांची यादी जाहीर केली असून, त्यात अभिनेता रणवीर सिंहच्या 'धुरंधर' चित्रपटातील गाण्यांनी बाजी मारली आहे.

विशेष म्हणजे या चित्रपटातील 'गहरा हुआ' हे गाणे सलग सात महिन्यांपासून पहिल्या क्रमांकावर कायम आहे. डिसेंबर 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'धुरंधर' या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. चित्रपटासोबतच त्यातील गाण्यांनीही सोशल मीडियावर आणि विविध संगीत प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घातला.

विशेषतः 'गहरा हुआ' या गाण्याने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. या गाण्यात रणवीर सिंहसोबत अभिनेत्री सारा अर्जुन दिसली असून, दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली. रोमँटिक भावनांनी भरलेल्या या गाण्याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले आहे.

यूट्यूबवर या गाण्याला आतापर्यंत 20 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, जे त्याच्या लोकप्रियतेचे द्योतक मानले जात आहे. 'गहरा हुआ' या गाण्याला प्रसिद्ध गायक अरिजीत सिंग आणि अरमान खान यांनी आपला आवाज दिला आहे. दोघांच्या सुरेल गायकीमुळे हे गाणे अधिकच लोकप्रिय झाले आहे.

ऑर्मेक्सच्या या ताज्या अहवालातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे की, 'धुरंधर'मधील गाणी सध्या संगीतप्रेमींच्या पसंतीच्या शिखरावर आहेत. विशेषतः 'गहरा हुआ' हे गाणे सातत्याने लोकप्रियतेचे नवे विक्रम प्रस्थापित करत असून, येत्या काळातही त्याची क्रेझ कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.