PHOTO: हातातोंडाशी आलेलं पीक मातीमोल, शेतकरी धाय मोकलून रडले

हातातोंडाशी आलेले सोन्यासारखे पीक मातीमोल झाल्याने शेतकऱ्यांवर धाय मोकलून रडण्याची वेळ आली आहे. | Farmers lost crops due to heavy rain

Rohit Dhamnaskar | Updated on: Oct 15, 2020 | 1:19 PM
1 / 9
राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या परतीच्या पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. विशेषत: ग्रामीण भागात पावसाचा प्रचंड जोर आहे. त्यामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे.

राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या परतीच्या पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. विशेषत: ग्रामीण भागात पावसाचा प्रचंड जोर आहे. त्यामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे.

2 / 9

हातातोंडाशी आलेले सोन्यासारखे पीक मातीमोल झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर धाय मोकलून रडण्याची वेळ आली आहे.

3 / 9

औरंगाबादमध्ये 'टीव्ही 9 मराठी'ने या शेतकऱ्यांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी कॅमेऱ्यासमोर आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली. हे विदारक चित्र डोळ्यात अश्रू उभे करणारे आहे.

4 / 9

कपाशी, सोयाबीन आणि मक्याचे संपूर्ण पीक उद्ध्वस्त झाले आहे.

5 / 9

मराठवाड्यात यंदा नेहमीच्या सरासरीपेक्षा खूपच जास्त प्रमाणात पाऊस कोसळला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांत शेतकऱ्यांना व्यवस्थित पीक घेता आले नव्हते. यानंतरही शेतकऱ्यांनी उमेद न हारता दुबार-तिबार पेरणी केली होती. मात्र, परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची ही सर्व मेहनत पाण्यात घालवली आहे.

6 / 9

मुसळधार पावसामुळे संपूर्ण शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे.

7 / 9

याठिकाणी इतका पाऊस पडला आहे की शेतजमिनीला पाणथळ जागेचे स्वरुप आले आहे.

8 / 9

कपाशीचे पीक घ्यायला गेलो तर संपूर्ण शेतीच पाण्याखाली गेली. आता आम्ही जगायचे कसे, आमच्या मुलाबाळांचे शिक्षण कसे करायचे, असा सवाल एका उद्विग्न शेतकऱ्याने केला.

9 / 9

पाण्यात भिजल्यामुळे कपाशीच्या पिकाची झालेली ही अवस्था.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us