
Sanchar Saathi Portal: देशात रोज मोबाईल युझर्सला बँक, विमा कंपन्या, मार्केटिंग एजन्सींकडून कॉल्स आणि मॅसेजेचा त्रास होतो. रोज येणाऱ्या या कॉल्समुळे काही जणांची चिडचिड होते. हे कॉल्स आणि SMS बहुतेकदा उत्पादन विकण्याच्या उद्देशाने करण्यात येतात. त्याला अनावश्यक व्यावसायिक संपर्क (Unsolicited Commercial Communication)” असे म्हटले जाते.

हे कॉल्स डोकंच उठवत नाही तर फसवणुकीचा अथवा योजनेत अडकवण्याचाही डाव असतो. Airtel आणि Jio सारख्या कंपन्यां AI-आधारीत स्पॅम कॉल्स ओळखण्याची सुविधा देतात. पण काही नंबर ही प्रणाली ओळखू शकत नाही. त्यातून फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दूरसंचार नियंत्रण प्राधिकरणाने (TRAI) स्पॅम आणि अनावश्यक कॉल्सविरुद्ध कडक नियम बनवले आहेत. TRAI च्या मते कंपन्या आणि व्यक्ती व्यावसायिक कॉल करू शकतात. पण त्यांचे क्रमांक नोंदणीकृत असावेत. नियमांचे उल्लंघन केल्यास त्या व्यावसायिकांची दूरसंचार सेवा निलंबित करण्याची तरतूद आहे.

TRAI चे मते जर अशा प्रकारच्या तक्रारी आल्या तर संबंधित नंबर दूरसंचार कंपन्यांनी तात्काळ ब्लॉक करणे आवश्यक आहे. त्यांची सेवा ताबडतोड बंद करणे गरजेचे आहे. त्या व्यक्तीचे नाव व पत्ता दोन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्याची तरतूद आहे.

Sanchar Saathi पोर्टलवर अशा फसव्या कॉल्सची तक्रार करता येते. तुम्हाला सतत असे कॉल्स आणि खोटे SMS येत असतील, तर तुम्ही या पोर्टलवर तक्रार नोंदवू शकता. Department of Telecommunications (DoT) चा अधिकृत प्लॅटफॉर्म आहे.

सर्वात आधी Sanchar Saathi पोर्टलवर जा आणि तिथे ‘Citizen Centric Services’ विभागात ‘Report Suspected Fraud & Unsolicite’ सेक्शनमध्ये ‘Report Suspected Fraud & Unsolicited Commercial Communication’ वर क्लिक करा. त्यानंतर Voice Call अथवा SMS द्वारे आलेल्या स्पॅम किंवा UCC तक्रार नोंदवण्याचा पर्याय दिसेल.

युझर्सला स्मॅप नंबरची माहिती, तारीख आणि वेळ नोंदवावी लागेल. नंतर ‘Continue Reporting’ वर क्लिक करा आणि तुमची तक्रार नोंदवली जाईल. ही तक्रार संबंधित टेलीकॉम ऑपरेटरकडे पाठवली जाते. नियमांनुसार कारवाई करण्यात येते.