
मुंबईसह उपनगरमध्ये शुक्रवारी मुसळधार पाऊस झाला. यामुळे अंधेरी सबवे पाण्यात गेला आहे. रस्त्यांवर दोन फुटांपर्यंत पाणी साचले आहे. भुयारी मार्गापासून दुकाने आणि लोकांच्या घरात पाणी शिरले आहे.

मुंबई उपनगरच्या दादर, बांद्रा, अंधेरी, बोरीवली, दहिसर, कांदिवलीमध्ये सध्या अधून मधून पाऊस सुरू आहे. रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे अनेक वाहनांचे टायर पाण्यात गेले आहेत. नागरिकांना पाण्याच्या मार्गाने प्रवास करावा लागत आहे.

लोकांच्या सुरक्षेसाठी पोलिस, बीएमसी आणि स्थानिक नागरिक येथे तैनात आहेत. मुंबई आणि उपनगरातील अनेक ठिकाणी फक्त पाणीच दिसत आहे.

मुंबई महानगर पालिकेचे कर्मचारी सतत पाणी काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मुसळधार पावसामुळे उपनगरी वाहतुकीचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. बेस्टकडून अनेक मार्गावरील बसेस वळवल्या आहेत.

वसई विरार नालसोपर्यातील दयनीय अवस्था झाली आहे. या भागातील अनेक रस्ते पाण्याखालीच आहेत. रस्त्यांवर पाणी साचल्याने गाडी चालवताना वाहनधारकांची तारांबळ उडत आहे.