कोणती डाळ किती वेळ भिजत ठेवावी? जाणून घ्या आहारतज्ज्ञ काय सांगतात
डाळी आरोग्यास लाभदायक असतात, पण कोणती डाख किती वेळ भिजवल्यास त्याचा आरोग्यास फायदा होऊ शकतो. याबद्दल कोणाला काहीही माहिती नसतं.. स्नायूंच्या विकासासाठी आणि शरीरातील अशक्तपणा दूर करण्यासाठी डाळी फार महत्त्वाच्या असतात. त्यामुळे जाणून घ्या कोणती डाळ किती वेळ भिजवली पाहिजे

अख्खी मूग डाळ: अख्खी मूग डाळ ६ ते ८ तास भिजवून ठेवावी. यामुळे ती पचायला सोपी जाते आणि पटकन शिजते. मूग डाळीमुळे पचनक्रिया सुधारण्यास आणि हाडे बळकट करण्यास मदत करतात.

सोललेले मूग: सोललेले मूग २ ते ४ तास भिजवल्याने पोषक तत्वांचे शोषण सुधारते. यामध्ये असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

पिवळे मूग: पिवळे मूग भिजवणे देखील महत्त्वाचे आहे. तुम्ही ते ३० मिनिटांपासून ते २ तासांपर्यंत भिजवू शकता, कारण यामुळे पचनक्रिया सुधारते. ही डाळ सर्वाधिक पचायला हलकी आणि प्रथिनेयुक्त असते.

मसूर डाळ: जरी डाळ साधारणपणे १ ते २ शिट्ट्यांमध्ये शिजत असली तरी, ती १ तास भिजवून ठेवावी. यामुळे ती पचायला सोपी जाते. मसूर डाळ लोह आणि प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. अनेकांनी ही डाळ आवडते.

काळी उडीद डाळ: पोषणतज्ञांच्या मते, काळी उडीद डाळ ८ ते १० तास भिजवून ठेवावी. यामुळे ती चांगली शिजते आणि सहज पचते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी आणि हृदयविकाराचा धोका असणाऱ्यांसाठी काळी उडीद लाभदायक आहे.