
पाकिस्तानविरोधात भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले आहे. पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहे. भारताने पाकड्यांचे 11 एअरबेस नष्ट केले. पाकच्या हवाई दलाचे मोठे नुकसान झाले. विशेष म्हणजे भारतीय लष्कराने नियंत्रण रेषा न ओलंडताच मिसाईल डागली आणि हे नुकसान केले.

भविष्यात आता तोच देश शक्तिशाली असेल जो सर्वात दूर मिसाईल डागण्याची क्षमता ठेवेल. त्यामुळे आता जागतिक शक्ती अशा मिसाईल तयार करण्याच्या स्पर्धेत अग्रेसर आहे. शत्रूच्या ठिकाणांवर अचूक निशाणा साधण्यासाठी प्रयत्न करत आहे. चीनने एक अशी मिसाईल तयार केली आहे की ती जगातील कोणत्याही भागात अवघ्या 30 मिनिटात निशाणा साधेल.

चीन शास्त्रज्ञांनी अंतराळातून हायपरसोनिक मिसाईल लाँच करण्याची क्षमता विकसीत केल्याचा दावा केला आहे. चीनची वैज्ञानिक पत्रिका एक्टा एरोनॉटिक ॲट ॲस्ट्रोनॉटिका सिनिकाच्या ताज्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. हे क्षेपणास्त्र री-अँट्री ग्लाईड व्हेईकलने (RGV) लेस आहे. ही मिसाईल 13,000 किमी प्रति तास वेगाने धडकू शकते.

दाव्यानुसार, जगातील कोणत्याही भागात ही मिसाईल अवघ्या 30 मिनिटात पोहचेल. चीननुसार आता त्यांनी याविषयीचे तंत्रज्ञान विकसीत केले आहे. ही मिसाईल तयार करायला आणि त्याच्या उत्पादनास अजून काही दिवस लागतील.

हायपरसोनिक मिसाईलची गती इतकी असेल की तिला शोधणे आणि हवेतच नष्ट करणे अवघड होईल. तांत्रिकदृष्ट्या तिचे विश्लेषण करणे अवघड असेल. भारताच्या मिसाईल पुढे पाकिस्तानमधील चीनचे रडार सुद्धा अपयशी ठरल्याचे जगाने पाहिले आहे.

चीननुसार, ही मिसाईल अंतराळातून डागल्या जाऊ शकते. विशेष म्हणजे हे क्षेपणास्त्र कोणत्याही स्थितीत कुठल्याही दिशेने नेता येऊ शकते. त्याची दिशा बदलू शकते. हे क्षेपणास्त्र जमीन, पाणी, हवा आणि अंतराळतून मारा करू शकते.

चीनच नाही तर अमेरिका, ब्रिटेनसह सुपरपॉवरफुल हायपरसोनिक क्रूज मिसाईल तयार करण्याच्या प्रकल्पावर कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. 2030 पर्यंत असे मिसाईल जगात धडकी भरवण्यासाठी तयार होतील.