AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajpal Yadav याला 5 कोटी देणारा ‘तो’ उद्योजक कोण, पैसे देताना कुठली एक अट ठेवलेली? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Rajpal Yadav: बॉलिवूडचा विनोदवीर अभिनेता राजपाल यादव सध्या मोठ्या अडचणीत अडकला आहे. आता अभिनेत्याला 5 कोटी रुपये कोणत्या उद्योजकाने आणि कोणच्या उद्देशाने दिले होते. याबद्दल मोठं सत्य समोर आलं आहे.. शिवाय एक अट देखील ठेवली होती.. जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

Rajpal Yadav याला 5 कोटी देणारा 'तो' उद्योजक कोण, पैसे देताना कुठली एक अट ठेवलेली? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
Rajpal Yadav
| Updated on: Feb 13, 2026 | 1:49 PM
Share

Rajpal Yadav: अभिनेता राजपाल यादव याने अनेक सिनेमांमध्ये विनोदी भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. अभिनेता सलमान खान, शाहरुख खान, शाहिद कपूर यांसारख्या लोकप्रिय अभिनेत्यांसोबत स्क्रिन शेअर करत राजपाल याने बॉलिवूडमध्ये दमदार भूमिका साकारली. पण आता अभिनेता भारतातील सर्वांत मोठ्या तुरुंगात आहे. अभिनेता सध्या तिहार तुरुंगात आहे. सांगायचं झालं तर, 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अता पता लापता’ सिनेमाच्या वादाबाबत अभिनेत्याला कोर्टाने शिक्षा सुनावली होती. सिनेमाचं दिग्दर्शन राजपाल यादव याने केलं होतं. तर सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आणि सिनेमाने फक्त 37 लाख रुपयांची कमाई केली.

सिनेमा फ्लॉप झाला. जेवढ्या बजेटमध्ये सिनेमा तयार करण्यात आलेला, तेवढी कमाई देखील सिनेमा करु शकला नाही. अशात उद्योजकाने राजपाल यादव याच्याकडे सतत पैसे मागण्यास सुरुवात केली. अखेर हे प्रकरण सत्र दंडाधिकारी न्यायालयात गेले आणि त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचलं.

मिळालेल्या माहितीनुसार, 2010 मध्ये ‘अता पता लापता’ सिनेमासाठी राजपाल याने दिल्ली येथील कंपनी मुरली प्रोडेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून 5 कोटी रुपये घेतले. या कंपनाचे मालक माधव गोपाळ अग्रवाल आहे. माधव एक उद्योजक आहेत. पैसे मिळत नसल्यामुळे राजपाल यांच्या विरोधाक माधव यांनी तक्रार दाखल केली. तेव्हा माधव यांनी राजपाल याच्याकडून सतत 5 कोटी रुपये मागण्याची सुरुवात केली.

पण एका मुलाखतीत राजपाल याने मोठा खुलासा केला होता, ‘सिनेमा तयार करण्यासाठी मला माधव गोपाल अग्रवार यांनी 5 कोटी रुपये दिले होते. मी ही रक्कम कर्ज म्हणून कधी घेतलीच नव्हती… त्यांनी फायनेंसर म्हणून सिनेमासाठी पैसे लावले होते. कारण त्यांना त्यांच्या नातवाल सिनेमात मुख्य अभिनेता म्हणून लॉन्च करण्याचं होतं.’, पण सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर माधव अग्रवाल यांनी राजपाल यांच्याकडून पैसे मागण्यास सुरुवात केली. हे प्रकरण कोर्टात पोहोचलं आणि कोर्टाने राजपाल याची दोषी म्हणून घोषणा केली…

2018 मध्ये दिल्लीच्या दंडाधिकारी न्यायालयाने राजपाल यादव याला 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर हे प्रकरण सत्र न्यायालयात पोहोचले. 2019 मध्ये या न्यायालयानेही राजपाल यादवची शिक्षा कायम ठेवली. दरम्यान, राजपाल यादव याच्याकडे असलेल्या पैशांवरील व्याज वाढतच गेले आणि रक्कम 9 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. अनेक वर्ष कायदेशीर लढाई लढल्यानंतर राजपाल यादव याने 5 फेब्रुवारी 2026 मध्ये तिहार तुरुंगात सरेंडर केलं. सध्या राजपाल यादव तुरुंगात असून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी अभिनेत्याच्या मदतीला धावून आले आहेत.

Follow Us
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या....
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या.....
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?.
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू.
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग.
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू.
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण.
अशोक खरात सोबत शिंदे, चाकणकरांचे कॉल्स; अंजली दमानियांकडे CDR?
अशोक खरात सोबत शिंदे, चाकणकरांचे कॉल्स; अंजली दमानियांकडे CDR?.
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....