
भारत आणि इराणमध्ये शतकानुशतके जुने व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध आहेत. इराण त्याच्या अनेक आवश्यक गरजांसाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भारतावर अवलंबून आहे.

भारताच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इराण भारताला कच्चे तेल पुरवतो. भारत दरवर्षी इराणकडून लाखो लिटर तेल खरेदी करतो. मात्र युद्धामुळे या व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

तसेच भारत इराणला औषधे, तांदूळ, गहू, साखर आणि कापूस यांची निर्यात करतो. तसेच इराण बासमती तांदळाचा प्रमुख खरेदीदार आहे.

याशिवाय, चहा, साखर, औषधे, ऑटो पार्ट्स आणि काही अभियांत्रिकी साहित्य देखील भारतातून इराणला निर्यात केले जाते. हा व्यापार दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर आहे.

भारत इराणमधून पिस्ता आणि खजूर, काही रसायने, पेट्रोकेमिकल उत्पादने आणि काचेच्या वस्तू आयात करतो. 1947 च्या फाळणीपूर्वी भारत आणि इराण भौगोलिकदृष्ट्या जवळ होते. मात्र पाकिस्तानच्या निर्मितीमुळे थेट जमीनी संबंध तुटले, मात्र तरीही दोन्ही देशांमधील व्यापार नियमितपणे सुरू आहे.