
जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. जान्हवी कपूर आणि वरुण धवन यांचा बवाल हा चित्रपट 21 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना जान्हवी कपूर आणि वरुण धवन हे दिसत आहेत. दिल्लीमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे बघायला मिळतंय.

दिल्लीच्या पुराचा फटका हा जान्हवी कपूर हिला देखील बसलाय. उलझ चित्रपटाचे शूटिंग हे दिल्लीमध्ये होणार होते. मात्र, पावसामुळे शूटिंग पुढे ढकलण्यात आले आहे.

विशेष म्हणजे दिल्लीमध्ये 15 दिवसांचे शूटिंगचे शेड्यूल होते. पावसामुळे ते होऊ शकत नाहीये. दिल्लीच्या अनेक ठिकाणी उलझ चित्रपटाचे शूट होणार आहे.

जान्हवी कपूर हिचा काही दिवसांपूर्वीच मिली हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला धमाका करण्यात यश मिळाले नाही आणि हा चित्रपट फ्लाॅप गेला.