
तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर काळी मिरी आणि ओवा गरम पाण्यात मिक्स करून प्या. रोज असे केल्याने अन्न सहज पचते आणि छातीत जळजळ होण्याची समस्याही दूर होते.

गरम पाणी त्वचेसाठीही फायदेशीर आहे. जर तुम्ही नेहमीच तेलकट पदार्थ खात असाल तर तुम्ही नक्कीच गरम पाणी प्यावे.

पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी गुणकारी काळे मीठ देखील अत्यंत फायदेशीर आहे. गरम पाण्यामध्ये काळे मीठ आणि ओवा मिक्स करून प्या.

जर तुम्ही तेलकट किंवा जड अन्न खाल्ले असेल तर तुम्हाला पुढील जेवणाचे नियोजन अतिशय काळजीपूर्वक करावे लागेल. म्हणजे पुढच्या जेवणामध्ये हलके अन्न खाणे आवश्यक आहे.

जेवण तेलकट असो वा जड, जेवल्यानंतर चालायलाच हवे. चालण्याने शरीराच्या समस्या तर दूर होतीलच पण अन्न पचण्यासही मदत होते. खाल्ल्यानंतर 100 ते 200 पावले चालणे आवश्यक आहे.