अहिल्यानगरात ATS ची मोठी छापेमारी, पाकिस्तानी गँगस्टर्सच्या…कारवाईत कमालीची गुप्तता; काय घडतंय?
अहिल्यानगरातील श्रीरामपूरमध्ये महाराष्ट्र एटीएस पथकाने छापेमारी केली आहे. पाकिस्तानी गँगस्टरच्या संपर्कात असल्याच्या संशयाखाली महाराष्ट्र एटीएसने चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात त्यांची चौकशी करण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून देशातील वेगवेगळ्या तपास यंत्रणा चांगल्याच अलर्ट मोडवर आहेत. नुकतेच दिल्ली पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलं आहे. दिल्ली, मुंबई तसेच देशातील इतर महत्त्त्वाच्या शहरांत दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता. (संग्रहित फोटो)

दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या या संशयितांकडे शस्त्रं सापडली आहेत. त्यांचा संपर्क पाकिस्तानातील दहशतवाद्यांशी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, आता तपाससंस्था देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करत आहेत. (संग्रहित फोटो)

असे असतानाच आता अहिल्यानगरातील श्रीरामपूरमध्ये महाराष्ट्र एटीएस पथकाने छापेमारी केली आहे. पाकिस्तानी गँगस्टरच्या संपर्कात असल्याच्या संशयाखाली महाराष्ट्र एटीएसने चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात त्यांची चौकशी करण्यात आली. (संग्रहित फोटो)

चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेले हे सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तान गँगस्टरच्या संपर्कात असल्याची प्राथमिक माहिती महाराष्ट्र एटीएसला मिळाली होती. पाकिस्तानी गँगस्टर भाटी आणि राणाच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून त्यांना ताब्यात घेण्यात आलं. (संग्रहित फोटो)

चौकशीदरम्यान एटीएस पथकाकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. संशयितांनी पाकिस्तानी गँगस्टरच्या सूचनेनुसार काहींच्या घराची रेकी केल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, आता या प्रकरणी काय समोर येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (संग्रहित फोटो)