मान्सूनची फिक्स तारीख आली रे! राज्यात या दिवशी पाऊस; शेतकऱ्यांनो लागा तयारीला!
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार आता केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे. आता त्याची वाटचाल महाराष्ट्राच्या दिशेने सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी तयारी सुरू करावी, असे सांगितले जात आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मान्सून कधी एकदा भारतात दाखल होईल, असे विचारले जात होते. विशेष म्हणजे या वर्षी मान्सून वेळेआधीच येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. परंतु तो यंदा उशिराने केरळमध्ये दाखल झाला आहे.

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार आता केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे. आता त्याची वाटचाल महाराष्ट्राच्या दिशेने सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी तयारी सुरू करावी, असे सांगितले जात आहे.

भारतीय हवामान विभागाचे अधिकारी डॉ. एस डी सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार आता मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर पुढच्या दोन ते तीन दिवसांत तो महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो.

महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनाचे पोषक वातावरण तयार झाले आहे. यावर्षी मान्सून चार दिवस उशिराने केरळमध्ये दाखल झाला आहे. पुढील २ ते ३ दिवसात महाराष्ट्रातील तळकोकण, गोवा या भागात मान्सून येईल, असे एस.डी सानप यांनी सांगितले.

दरम्यान, आता मान्सून आल्याने घरांची डागडुजी करावी, शेतकऱ्यांनी पेरणीसाठी बियांणांची, खतांची तजवीज करावी, असे सांगण्यात आले आहे. तसेच शहरी भागात नालेसफाई तसेच इतर महत्त्वाची कामे लवकर उरकून घ्यावीत, असेही आवाहन करण्यात आले आहे.