Rain Update : राज्यात तुफान गारपीट, 5 एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांवर मोठं संकट; पंजाबराव डख यांनी सांगितलं कुठं कुठं पाऊस पडणार?

पंजाबराव डख यांनी पुढच्या काही दिवसांत हवामान कसे असेल, याबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या दाव्यानुसार राज्यात काही भागात मोठी गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यांनी शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

| Updated on: Apr 01, 2026 | 8:21 PM
1 / 5
आता 1 ते 4 एप्रिल या काळात महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट होईल. काही ठिकाणी लिंबाएवढ्या आकाराच्या गारा पडतील. काही ठिकाणी बोरांएवढ्या तर काही ठिकाणी चिंचोक्याएवढ्या गारा पडलेल्या पहायला मिळतील, असा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.

आता 1 ते 4 एप्रिल या काळात महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट होईल. काही ठिकाणी लिंबाएवढ्या आकाराच्या गारा पडतील. काही ठिकाणी बोरांएवढ्या तर काही ठिकाणी चिंचोक्याएवढ्या गारा पडलेल्या पहायला मिळतील, असा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.

2 / 5
या पावसात विजा कोसळण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपण आपल्या जिवाची काळजी घ्यावी. पाऊस आलेला असताना झाडाखाली थांब नका. झाडावर विजा पडण्याचे प्रमाण 16 टक्के असते, असाही सल्ला पंजाबराव डख यांनी दिला आहे.

या पावसात विजा कोसळण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपण आपल्या जिवाची काळजी घ्यावी. पाऊस आलेला असताना झाडाखाली थांब नका. झाडावर विजा पडण्याचे प्रमाण 16 टक्के असते, असाही सल्ला पंजाबराव डख यांनी दिला आहे.

3 / 5
1 एप्रिलनंतर पावसात वाढ होणार आहे. 2 एप्रिल, 3 आणि चार एप्रिल रोजी राज्यात वेगवेगळ्या भागात रोज पाऊस पडणार आहे. त्यामुळेच योग्य काळजी घ्यावी, असे आवाहनही पंजाबराव डख यांनी केले आहे.

1 एप्रिलनंतर पावसात वाढ होणार आहे. 2 एप्रिल, 3 आणि चार एप्रिल रोजी राज्यात वेगवेगळ्या भागात रोज पाऊस पडणार आहे. त्यामुळेच योग्य काळजी घ्यावी, असे आवाहनही पंजाबराव डख यांनी केले आहे.

4 / 5
पंजाबराव डख यांच्या मतानुसार 5 एप्रिल रोजीनंतर राज्यातील हवामान कोरडे राहील. पश्चिम विदर्भ, मराठवाड्यातही पाऊस पडणार आहे. कांदा पीक झाकून ठेवावे, गहू पिक लवकरात लवकर काढून घ्यावे, असेही पंजाबराव डाख यांनी सांगितले आहे.

पंजाबराव डख यांच्या मतानुसार 5 एप्रिल रोजीनंतर राज्यातील हवामान कोरडे राहील. पश्चिम विदर्भ, मराठवाड्यातही पाऊस पडणार आहे. कांदा पीक झाकून ठेवावे, गहू पिक लवकरात लवकर काढून घ्यावे, असेही पंजाबराव डाख यांनी सांगितले आहे.

5 / 5
5 एप्रिलनंतर विट उत्पादकांना विटांचे उत्पादन पुन्हा सुरू करता येईल, असेही त्यांनी सांगितले. गारपीट संपूर्ण राज्यात होणार नाही. नांदेड, लातूर, बीड, अहिल्यानगर, संभाजीनगर, जळगाव, नंदूबार, धुळे, नाशिक, सतारा, कोल्हापूर, धाराशीव, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यात चार दिवसांत गारपीट होईल, असेही पंजाबराव डख यांनी सांगितले.

5 एप्रिलनंतर विट उत्पादकांना विटांचे उत्पादन पुन्हा सुरू करता येईल, असेही त्यांनी सांगितले. गारपीट संपूर्ण राज्यात होणार नाही. नांदेड, लातूर, बीड, अहिल्यानगर, संभाजीनगर, जळगाव, नंदूबार, धुळे, नाशिक, सतारा, कोल्हापूर, धाराशीव, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यात चार दिवसांत गारपीट होईल, असेही पंजाबराव डख यांनी सांगितले.

Follow Us