Manoj Jarange Patil : अंगात त्राण नाही, अशक्तपणा अशा अवस्थेत मुंबईला निघालेले मनोज जरांगे म्हणाले, मी मेलो तर त्याला एकच माणूस जबाबदार
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे मुंबईला निघाले आहेत. उपोषणामुळे त्यांच्या अंगात त्राण दिसत नाहीय. मुंबई पोलिसांनी त्यांना उपोषणासाठी परवानगी नाकारली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी 50 लोकांसह उपोषणाची परवानगी मागितली होती. पण त्यांना परवानगी नाकारण्यात आली.

मनोज जरांगे पाटील यांच्याशी टीव्ही 9 मराठीने संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सर्वांना गणपतीच्या शुभेच्छा दिल्या. तुम्ही अन्न सोडलय, पाणी पित नाही पित आहात. अशक्तपणाचा त्रास होतोय. त्यावर ते म्हणाले की, समाजाच्या लेकरासाठी. समाजाच्या लेकराला मोठ करायचं आणि मरायचं.
आझाद मैदानात पोलीस परवागनी देत नाहीयत. त्यावर ते म्हणाले की, न्यायाधीशांनी सांगितलय की रोखू शकत नाही. उपोषणापासून कोणाला रोखू शकत नाही.त्यामुळे न्यायालयाने आम्हाला परवानगी दिली आहे. त्यांच्या आडमुठेपणाला आम्ही गिनत नाही.
पाटण, श्रीगोंदा, हडपसर, खोपोली मार्गे ते आझाद मैदानात दाखल होणार आहेत. पण खोपोलीचा टप्पा सुटू शकतो म्हणजे ते कदाचित तिथे थांबणार नाहीत असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.
सरकारने वाटेत येऊन चर्चा केली तर? त्यावर मनोज जरांगेंनी अंमलबजावणीचं पाहिजे असं उत्तर दिलं. 50 लोकांची परवानगी मागितली आहे. त्यांच्या लेकराच्या कल्याणासाठी चाललोय. ते आशीर्वाद द्यायला येतील. पूर्ण येणार नाहीत.
त्यांच्या लेकरासाठी मी मरायला तयार असताना ते मला आशिर्वाद द्यायला आलेत. मी मेलो तर देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील. काही केल्याशिवाय मी थांबणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.