Adinath Kothare and Urmila Kanetkar Divorce: आदिनाथ-उर्मिलाचा 16 वर्षांचा संसार का मोडला? नेमकं कारण तरी काय?
Adinath Kothare and Urmila Kanetkar Divorce: नुकताच सर्वांची आवडती जोडी आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर यांनी घटस्फोटाची घोषणा केली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय आणि सर्वांची आवडती जोडी आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर विभक्त झाले आहेत. लग्नाच्या जवळपास 16 वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला आहे. आता दोघांमध्ये नेमकं काय बिनसलं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

आदिनाथ आणि उर्मिला यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत घटस्फोटाची माहिती दिली आहे. त्यांनी लेक जिजासाठी कायम एकत्र येणार असल्याचे देखील म्हटले आहे. "जोडीदार म्हणून आमचा प्रवास इथे संपत असला, तरी आमची मुलगी जिज़ा हिच्यासाठी आम्ही नेहमी एकत्र आहोत. ती आमचं सर्वस्व आहे. तिला भरपूर प्रेम, सुरक्षितता आणि पाठिंबा मिळावा, यासाठी आम्ही आनंदाने आणि पूर्ण जबाबदारीने एकत्र येऊन तिचे संगोपन (Co-parenting) करत आहोत" असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

"या विषयावर आमचे हेच एकमेव वक्तव्य असेल आणि यापुढे आम्ही यावर कोणतीही कमेंट किंवा चर्चा करणार नाही. तुमचं प्रेम आणि समजूतदारपणाबद्दल मनापासून धन्यवाद. आदिनाथ आणि ऊर्मिला" असे त्यांनी पोस्टच्या शेवटी लिहिले आहे.

आदिनाथ आणि उर्मिला यांनी त्यांच्या घटस्फोटाचे स्पष्ट कारण अद्याप सांगितलेले नाही. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे आहे. तसेच आदिनाथ आणि उर्मिला यांनी इतक्या टोकाचा निर्णय का घेतला? असा देखील प्रश्न अनेकांना पडला आहे. आता दोघेही यावर कधी प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आदिनाथ आणि उर्मिला यांच्यामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून बिनसले असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता त्यांनी घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली आहे.