Photo Gallery : अवकाळीने द्राक्ष उत्पादनात घट, वादळी वाऱ्याने तर फळबागाच हिरावल्या

| Updated on: Apr 12, 2022 | 11:40 AM

सातारा : निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक परिणाम हा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर झाला आहे. संपूर्ण हंगामात अवकाळीचे संकट हे सुरुच होते. त्यामुळे उत्पादनात तर घट झाली आहेच शिवाय शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही झाले आहे.हंगाम अंतिम टप्प्यात अन् द्राक्ष तोड सुरु असतानाच जिल्ह्यातील माण तालुक्यात मागील दोन दिवसात अवकाळीची अवकृपा ही सुरु आहे. मात्र, वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष बागा ह्या भुईसपाट झाल्या आहेत. चक्रीवादळाच्या तडाख्यात पळसावडे येथील द्राक्ष बागायतदार कुंडलिक यादव यांची पावणे दोन एकर द्राक्ष बाग आडवी झाली आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यातही अवकाळीची अवकृपा ही सुरुच आहे. आता न भरुन निघणारे नुकसान होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

1 / 4
आंबा फळपिकाचेही नुकसान: सातारा जिल्ह्यातील देवापूर येथील आंबा बागायतदार कृष्णराव रघूनाथ बाबर यांची एक एकर आंबा सोमवारी झालेल्या चक्रीवादळात भुईसपाट झाला आहे . या पावसामुळे कृष्णराव बाबर यांचे सुमारे 15 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

आंबा फळपिकाचेही नुकसान: सातारा जिल्ह्यातील देवापूर येथील आंबा बागायतदार कृष्णराव रघूनाथ बाबर यांची एक एकर आंबा सोमवारी झालेल्या चक्रीवादळात भुईसपाट झाला आहे . या पावसामुळे कृष्णराव बाबर यांचे सुमारे 15 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

2 / 4
पावणे दोन एकर बाग भुईसपाट:  चक्रीवादळात पळसावडे येथील द्राक्ष बागायतदार कुंडलिक यादव यांची पावणे दोन एकर द्राक्ष बाग भुईसपाट झाली.द्राक्ष तोडणीला आले असतानाच हे संकट त्यांच्यावर ओढावले आहे. त्यामुळे उत्पादनात घट नव्हे उत्पादनच पदरी पडते की नाही अशी स्थिती आहे.

पावणे दोन एकर बाग भुईसपाट: चक्रीवादळात पळसावडे येथील द्राक्ष बागायतदार कुंडलिक यादव यांची पावणे दोन एकर द्राक्ष बाग भुईसपाट झाली.द्राक्ष तोडणीला आले असतानाच हे संकट त्यांच्यावर ओढावले आहे. त्यामुळे उत्पादनात घट नव्हे उत्पादनच पदरी पडते की नाही अशी स्थिती आहे.

3 / 4
वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी: महिन्याकाठी वातावरणात बदल हा ठरलेलाच आहे. याचा सर्वाधिक फटका हा फळबागायतदार शेतकऱ्यांना बसलेला आहे. हवामान विभागाने अवकाळीचा अंदाज वर्तवला होता पण वाढलेल्या मुक्कामामुळे फळबागांचे अधिकचे नुकसान होत आहे. सातारा जिल्ह्यातील अनेक भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावलेली आहे.

वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी: महिन्याकाठी वातावरणात बदल हा ठरलेलाच आहे. याचा सर्वाधिक फटका हा फळबागायतदार शेतकऱ्यांना बसलेला आहे. हवामान विभागाने अवकाळीचा अंदाज वर्तवला होता पण वाढलेल्या मुक्कामामुळे फळबागांचे अधिकचे नुकसान होत आहे. सातारा जिल्ह्यातील अनेक भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावलेली आहे.

4 / 4
निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.