PHOTO Ind vs Eng: केवळ खराब बॅटिंगच नाही, तर विराट कोहलीते हे 5 निर्णयही पराभवाला कारणीभूत
या सामन्यात भारताच्या पराभवाला केवळ ढिसाळ फलंदाजी जबाबदार नाही, तर विराट कोहलीचे 5 निर्णयही कारणीभूत आहेत.
सामन्यात गोलंदाज वॉशिंगटन सुंदरचा चुकीचा उपयोग करण्यात आला. सुंदर धावसंख्या रोखण्यात यशस्वी ठरु शकला असता पण त्याला उशीरा 12 व्या षटकात गोलंदाजी देण्यात आली.
Follow us on
इंग्लंडने अहमदाबादमध्ये झालेल्या टी-20 सामन्यात भारताला पराभवाची धूळ चारली. इंग्लंडने भारताचा 8 विकेटने पराभव केला. भारताची फलंदाजी ढिसाळ निघाल्याने केवळ 124 धावाच होऊ शकल्या. असं असलं तरी या सामन्यात भारताच्या पराभवाला केवळ ढिसाळ फलंदाजी जबाबदार नाही, तर विराट कोहलीचे 5 निर्णयही कारणीभूत आहेत.
जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या रोहित शर्माला पहिल्याच सामन्यात विश्रांती देण्यात आली, हा पहिला चुकीचा निर्णय मानला जातोय.
भारतीय संघाची निवड करतानाही उणीवा दिसल्या. एकाच वेळी संघात 3 फिरकीपटू खेळवण्यात आले, हा दुसरा चुकीचा निर्णय असल्याचं बोललं जातंय.
दीपक चाहर सारख्या प्रतिभावान खेळाडूकडे दुर्लक्ष करत शार्दुल ठाकुरची निवड करणे. नवदीप सैनी हाही चांगला पर्याय होता. हा तिसरा चुकीचा निर्णय असल्याचं मत व्यक्त होतंय.
विराट कोहलीने या सामन्यात गोलंदाजांचा जो क्रम निवडला तो चुकीचा असल्याचं जाणकारांचं मत आहे. यामुळेही नुकसान झाल्याचं मानलं जातंय.
सामन्यात गोलंदाज वॉशिंगटन सुंदरचा चुकीचा उपयोग करण्यात आला. सुंदर धावसंख्या रोखण्यात यशस्वी ठरु शकला असता पण त्याला उशीरा 12 व्या षटकात गोलंदाजी देण्यात आली.