
अस म्हणतात ना यश कधीही सहज मिळत नाही, त्यासाठी कठोर परिश्रम आणि संघर्षाची किंमत मोजावी लागते. याचच उदाहरण म्हणजे बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी.

आज त्याच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली असली तरी एक काळ असा होता की त्याच्याकडे प्रवासासाठी पैसेही नव्हते. अनेकदा त्याला सेटवर जाण्यासाठी पायी चालत जावे लागायचे आणि कधी कधी उपाशीही राहावे लागायचे.

एका मुलाखतीत त्याने सांगितले होते की अनेकदा त्याला खाणे की बसचे भाडे यापैकी एक निवडावे लागायचे. त्यामुळे काही वेळा तो उपाशी झोपायचा. या कठीण परिस्थितींनी त्याला खचवले नाही उलट अधिक मजबूत बनवले. हळूहळू त्याने स्टंट आणि अॅक्शन दिग्दर्शनात आपली ओळख निर्माण केली.

त्याच्या करिअरला मोठी लोकप्रियता 'गोलमाल' चित्रपटामुळे मिळाली. आज रोहित शेट्टीचे नाव बॉलिवूडमध्ये अॅक्शन चित्रपटांसाठी ओळखले जाते. त्याच्या चित्रपटांमधील उडणाऱ्या गाड्या, मोठे स्फोट आणि थरारक अॅक्शन सीन हे त्याचे ट्रेडमार्क बनले आहेत.

संघर्षातून यश मिळवलेल्या रोहित शेट्टीचा प्रवास हा खर्या अर्थाने प्रेरणादायी मानला जातो. आज ते हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय दिग्दर्शकांपैकी एक आहेत.