105 वेळा लिहिलं गेलेलं गाणं, 66 वर्षांपासून प्रचंड लोकप्रिय, एकदा नाही पुन्हा-पुन्हा ऐकत आहेत लोक
105 वेळा लिहिलं गेलेलं प्रचंड सुपरहिट गाणं, ज्यामधील अभिनेत्रीच्या सौंदर्यावर फिदा होते लोक. गाणं इतकं सुपरहिट की लोक पुन्हा-पुन्हा ऐकतात.

भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात काही चित्रपट आणि त्यामागील व्यक्तिमत्त्वे अजरामर ठरली आहेत. त्यापैकी एक नाव म्हणजे दिग्दर्शक के. आसिफ. त्यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला ‘मुगल-ए-आजम’ हा चित्रपट आजही भारतीय सिनेमातील सर्वात भव्य आणि ऐतिहासिक चित्रपटांपैकी एक मानला जातो.

या चित्रपटातील ‘प्यार किया तो डरना क्या’ हे गाणं आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. 1960 मध्ये प्रदर्शित झालेला ‘मुगल-ए-आजम’ त्या काळातील भारतातील सर्वात महागडा चित्रपट ठरला.

या चित्रपटासाठी सुमारे 1.5 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. संगीतकार नौशाद यांच्या समाधानासाठी ‘प्यार किया तो डरना क्या’ या गाण्याचे बोल तब्बल 105 वेळा लिहिले गेल्याची माहिती प्रसिद्ध आहे.

या चित्रपटातील अनारकलीची भूमिका अभिनेत्री मधुबाला यांनी साकारली होती. त्यांच्या अभिनयामुळे आणि लता मंगेशकर यांच्या आवाजामुळे ‘प्यार किया तो डरना क्या’ हे गीत भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वकालीन लोकप्रिय गीतांपैकी एक बनले.

सहा दशकांहून अधिक काळ लोटल्यानंतरही या गाण्याची लोकप्रियता कायम आहे. आजही हे गाणं लोक प्रचंड आवडीने ऐकतात. या गाण्याला युट्यूबवर देखील मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळाले आहेत.