Photos: रामायणातील ही ठिकाणे आजही भारतात आहेत अस्तित्वात

Ramayana Places Exist in India : रामायण महाकाव्याशी संबंधित अनेक ठिकाणे आजही भारतात अस्तित्वात आहेत, जी भाविक आणि इतिहास संशोधकांसाठी महत्त्वाची तीर्थक्षेत्रे आहेत. यातील काही प्रमुख ठिकांनांची माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Dec 09, 2025 | 11:01 PM
1 / 6
अयोध्या, उत्तर प्रदेश : अयोध्या ही प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी असून, त्यांच्या राज्याची राजधानी होती. सरयू नदीच्या काठावर वसलेले हे शहर आजही महत्त्वाचे धार्मिक केंद्र आहे. येथे राम मंदिराची उभारणीही करण्यात आली आहे.

अयोध्या, उत्तर प्रदेश : अयोध्या ही प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी असून, त्यांच्या राज्याची राजधानी होती. सरयू नदीच्या काठावर वसलेले हे शहर आजही महत्त्वाचे धार्मिक केंद्र आहे. येथे राम मंदिराची उभारणीही करण्यात आली आहे.

2 / 6

चित्रकूट, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश : वनवासाच्या काळात राम, सीता आणि लक्ष्मणांनी इथे बराच काळ वास्तव्य केले होते. इथे रामघाट, कामदगिरी आणि भरत मिलाप मंदिर यांसारखी स्थळे आहेत.

3 / 6

पंचवटी (नाशिक), महाराष्ट्र : वनवासात प्रभू रामांनी इथे आपली पर्णकुटी बांधली होती. याच ठिकाणी शूर्पणखेचे नाक कापले गेले आणि रावणाने सीतेचे हरण केले. नाशिकजवळील हे ठिकाण सीता गुफा (सीता गुहा) साठी प्रसिद्ध आहे.

4 / 6

किष्किंधा (हंपी जवळ, कर्नाटक) : हे वानरराज सुग्रीव आणि हनुमान यांचे राज्य होते. आज कर्नाटकातील हंपी जवळील अनेगुंडी या ठिकाणाला प्राचीन किष्किंधा मानले जाते. येथील अंजनेय पर्वत (हनुमानाचे जन्मस्थान मानले जाते) आणि पंपा सरोवर प्रसिद्ध आहेत.

5 / 6

दंडकारण्य, मध्य भारत : रामायणात उल्लेख केलेला हा विशाल वनप्रदेश आजच्या छत्तीसगड, ओडिशा आणि आंध्र प्रदेशातील काही भागांमध्ये पसरलेला आहे. इथे अनेक ऋषी-मुनींचे आश्रम होते.

6 / 6

रामसेतू : तामिळनाडूतील रामेश्वरम आणि श्रीलंकेतील मन्नार बेटांदरम्यान असलेल्या चुनखडीच्या थरांची ही साखळी, श्रीरामांनी बांधलेला पौराणिक सेतू मानली जाते. या स्थळांव्यतिरिक्त, अनेक लहान-मोठी मंदिरे, नद्या आणि आश्रम रामायणातील घटनांशी जोडलेले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us