
2021 साली वर्ल्ड कप खेळणारा लेग स्पिनर वरूण चक्रवर्ती दोनवेळा यो-यो टेस्टमध्ये फेल झाला होता. त्यामुळे त्याला 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्याला संधी मिळाली नव्हती.

आयपीएलमध्ये 2018 साली केलेल्या दमदार कामगिरीमुळे टीम इंडियाचा दारे अंबाती रायडूसाठी उघडली होतीत. त्यानंतर तीन एकदिवसीय सामन्यांसाठी इंग्लंड दौऱ्यावर जायचं होतं. मात्र रायडू यो-यो टेस्टमध्या नापास झाला आणि त्याच्या जागी रैनाची निवड झाली होती. त्यानंतर परत त्याने टेस्ट देत आशिया कपच्या संघात एन्ट्री केली होती.

भारताचा वेगवान गोलंदाज आणि अनुभवी खेळाडू मोहम्मद शमीलाही फिटनेस चाचणीत अपयश आल्यामुळे संघातून बाहेर केलं होतं. फिटनेस चाचणीत अपयशी ठरल्याने 2021 मध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यातून शमीला वगळण्यात आले आणि त्याच्या जागी नवदीप सैनीची निवड करण्यात आली

भारतीय यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन भारत अ संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर जाणार होता पण योयो टेस्टमध्ये अपयशी ठरल्याने तो संघासोबत जाऊ शकला नाही. त्यावेळी संघात असलेल्या ऋषभ पंतला इंग्लंडमध्ये कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली.

युवा भारतीय सलामीवीर पृथ्वी शॉ देखील यो-यो चाचणीत केवळ 15 गुणांसह अपयशी ठरला होता.