GT vs MI : मुंबईच्या विजयाचे 4 वैशिष्ट्य, एकटा तिलक वर्माच गुजरातवर भारी
Gujarat Titans vs Mumbai Indians : मुंबई इंडियन्सचा विजयी सलामीनंतर सलग 4 सामन्यांत पराभूत व्हावं लागलेलं. त्यामुळे मुंबईसाठी गुजरात विरुद्धचा सामना हा प्रतिष्ठेचा होता. मुंबईने हा सामना एकतर्फी फरकाने जिंकला.

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात सोमवारी 20 एप्रिलपर्यंत 30 सामने खेळवण्यात आले. या 30 व्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने होते. मुंबईच्या या विजयाची काही खास वैशिष्ट्य आहेत. त्यापैकी काही वैशिष्ट्य ही तिलक वर्मा याच्याशी संबंधित आहेत. (Photo Credit: PTI)

तिलक वर्मा याने गुजरात विरुद्ध झंझावाती खेळी केली. तिलकने 45 चेंडूत नाबाद 101 धावा केल्या. तिलकच्या टी 20 कारकीर्दीतील एकूण पाचवं आणि तर आयपीएलमधील पहिलं शतक ठरलं. (Photo Credit: PTI)

तिलकला या नाबाद शतकी खेळीसाठी 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आलं. तिलकची आयपीएल स्पर्धेत सामनावीर पुरस्कार जिंकण्याची पहिलीच वेळ ठरली. (Photo Credit: PTI)

तिलकने केलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर मुंबईने गुजरातसमोर 200 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र गुजरातला एकट्या तिलकने केलेल्या धावाही करता आल्या नाहीत. तिलकने 101 धावा केल्या. तर मुंबईने गुजरातला 100 धावांवर गुंडाळलं. तिलक यासह प्रतिस्पर्धी संघापेक्षा सरस कामगिरी करणारा मुंबईचा पहिला फलंदाज ठरला. (Photo Credit: PTI)

मुंबईने गुजरातला 99 धावांनी पराभूत करत 19 व्या मोसमातील आपला दुसरा सामना जिंकला. मुंबईचा हा गुजरात विरुद्धचा अहमदाबादमधील पहिलावहिला तर एकूण दुसरा विजय ठरला. (Photo Credit: PTI)