
आयपीएल 2023 स्पर्धा संपून आता जवळपास 20 दिवस उलटले आहेत. एम एस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्स संघाने जेतेपदावर नाव कोरलं. आयपीएल संपली असून प्रत्येक संघातील खेळाडू आता आपल्या देशासाठी खेळत आहेत.

असं असलं तरी आयपीएल 2023 स्पर्धा खऱ्या अर्थाने वादामुळे चर्चेत आली. विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद चर्चेचा विषय ठरला. दुसरीकडे, आवेश खाने फेकलेलं हेल्मेटमध्ये अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

आयपीएल 2023 स्पर्धा संपल्यानंतर लखनऊ सुपर जायंट्सच्या आवेश खानला उपरती झाली आहे. त्या घटनेबद्दल त्याने जाहीर माफी मागितली आहे. मी असं करायला नको होतं, असं तो म्हणाला आहे.

त्या घटनेनंतर सोशल मीडियावर लोकांनी मला खरीखोटी सुनावली आहे. तसेच माझी कानउघडणी केली आहे. मला आता पश्चाताप होत असून मी तसं करायला नको होतं, असं आवेश खानने सांगितलं.

मागील दोन आयपीएल हंगामात मी चांगली कामगिरी केली होती. मात्र हा हंगाम माझ्यासाठी हवा तितका चांगला राहीला नाही, असंही तो पुढे म्हणाला. या पर्वात आवेशने 9 सामन्यात फक्त 8 गडी बाद केले.

मागील दोन हंगामाच्या तुलनेत चांगली कामगिरी झाली नाही. पण 10 पेक्षा कमी धावगती ठेवण्यास यश मिळाल्याचं, आवेश खानने सांगतिलं.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात 10 एप्रिल रोजी रोमहर्षक सामना झाला. या सामन्यात लखनऊने गडी राखून शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला होता.

शेवटच्या चेंडूवर लखनऊला विजयासाठी एका धावेची गरज होती. आवेश खान स्ट्राईकला होता पण, चेंडू बॅटला लागला नाही आणि कीपरकडे न गेला. मात्र या वेळेत आवेश धावला आणि एक रन पूर्ण केली. यावेळी आवेशने तावातावाने हेल्मेट काढून मैदानात आपटले. या कृतीसाठी त्याला दंड भरावा लागला होता.