IPL 2026: विराट कोहलीने खेळण्याच्या शैलीत असा केला बदल, फक्त 10 चेंडूत सर्व काही कळून जाईल
आयपीएल 2026 स्पर्धेत विराट कोहलीची बॅट सावधपणे गरजत आहे. त्याच्या खेळण्याच्या शैलीत बदल झाल्याचं क्रीडाप्रेमींना जाणवत आहे. नेमका काय बदल केला आहे आणि कसा ते जाणून घेऊयात..

विराट कोहली आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या पर्वापासून खेळत असून यंदा 19वं पर्व आहे. आतापर्यंत विराट कोहली एकाच फ्रेंचायझीसाठी नियमितपणे खेळला आहे. या काळात त्याने अनेक विक्रम रचले आणि मोडले आहेत. पण मागच्या तीन चार वर्षात त्याच्या फलंदाजीच्या शैलीत बदल झाला आहे. कसा आणि काय ते समजून घेऊयात..(Photo- IPL/BCCI)

आयपीएल 2026 स्पर्धेत विराट कोहली ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आहे. टॉप 5 मध्ये त्याचं नाव फिरताना दिसतं. त्याने सहा सामन्यात दोन अर्धशतकांसह 247 धावा केल्या असून टॉप 2 मध्ये स्थान मिळवलं आहे. त्यामुळे यंदाही त्याची बॅट चांगलीच तळपताना दिसत आहे. (Photo- IPL/BCCI)

मागच्या तीन-चार पर्वात विराट कोहलीची फलंदाजीची शैली खऱ्या अर्थाने बदलली दिसत आहे. विराट कोहली पूर्वीपेक्षा अधिक जोखीम पत्करत असल्याचं दिसत आहे. पहिल्या दहा चेंडूंशी संबंधित एक आकडेवारी समोर आली आहे. त्यातून हा उलगडा झाला आहे. (Photo- IPL/BCCI)

विराट कोहली आता पावरप्लेचा पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न करतो. यापूर्वी तो असं करत नव्हता. डावाच्या पहिल्या 10 चेंडूंमधील स्ट्राइक रेट सर्व काही सांगून जातो. २०२२ मध्ये कोहलीचा पहिल्या 10 चेंडूतील स्ट्राइक रेट हा 118 होता. 2023 मध्ये 126 पर्यंत, 2024 मध्ये 160 वर पोहोचला, 2025 मध्ये 154 आणि आता 2026 मध्ये 175 वर पोहोचला आहे.(Photo- IPL/BCCI)

क्रिकविझच्या आकडेवारीनुसार, 2021नंतर कोहलीने आक्रमक खेळण्यास प्राधान्य देत आहे.2021 त्याने 40.6 टक्के आक्रमक शॉट्स खेळले होते. त्यानंतर 2022 मध्ये 50.3 टक्के, 2023 मध्ये 62.5 टक्के, 2024 मद्ये 64.3 टक्के, 2025 मध्ये 68 टक्क्यांपर्यंत आणि आता 2026 मध्ये ही आकडेवारी 72.8 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. (Photo- IPL/BCCI)