आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात असं दुसऱ्यांदा घडलं, मुंबई इंडियन्सने पुन्हा कर्णधार बदलला

आयपीएल 2026 स्पर्धेतील 65वा सामना मुंबई इंडियन्स आणि केकेआर यांच्यात होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर मुंबई इंडियन्सने कर्णधार बदलून एक विक्रम रचला. यापूर्वी असं एकदाच घडलं होतं.

| Updated on: May 20, 2026 | 8:58 PM
1 / 5
आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. हा विक्रम धावा किंवा विकेटचा नाही. त्यामुळे चर्चा तर होणारच नाही. आयपीएल 2026 स्पर्धेतील 65व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने पुन्हा कर्णधार बदलला. (Photo: IPL/BCCI)

आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. हा विक्रम धावा किंवा विकेटचा नाही. त्यामुळे चर्चा तर होणारच नाही. आयपीएल 2026 स्पर्धेतील 65व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने पुन्हा कर्णधार बदलला. (Photo: IPL/BCCI)

2 / 5
आयपीएल स्पर्धेच्या 65व्या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्याने पुन्हा धुरा सांभाळली. हार्दिक पांड्या हा मुंबईचा फुल टाईम कर्णधार आहे. पण मागच्या सामन्यात दुखापतीमुळे खेळला नव्हता. त्यामुळे सूर्यकुमार यादवकडे धुरा आली होती. सूर्यकुमार यादवही मागच्या सामन्यात खेळला नाही. त्यामुळे ही धुरा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या हाती आली होती. (Photo: PTI)

आयपीएल स्पर्धेच्या 65व्या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्याने पुन्हा धुरा सांभाळली. हार्दिक पांड्या हा मुंबईचा फुल टाईम कर्णधार आहे. पण मागच्या सामन्यात दुखापतीमुळे खेळला नव्हता. त्यामुळे सूर्यकुमार यादवकडे धुरा आली होती. सूर्यकुमार यादवही मागच्या सामन्यात खेळला नाही. त्यामुळे ही धुरा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या हाती आली होती. (Photo: PTI)

3 / 5
मुंबई इंडियन्सचा आरसीबीविरुद्ध सामना 10 मे रोजी झाला. त्या सामन्यात हार्दिकच्या जागी सूर्यकुमार यादवने संघाचे नेतृत्व केले. त्यानंतर 14 मे रोजी पंजाब किंग्सविरुद्ध जसप्रीत बुमराहने कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतली. पण आता हार्दिक पांड्याने पुनरागमन केले आहे. (Photo: IPL/BCCI)

मुंबई इंडियन्सचा आरसीबीविरुद्ध सामना 10 मे रोजी झाला. त्या सामन्यात हार्दिकच्या जागी सूर्यकुमार यादवने संघाचे नेतृत्व केले. त्यानंतर 14 मे रोजी पंजाब किंग्सविरुद्ध जसप्रीत बुमराहने कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतली. पण आता हार्दिक पांड्याने पुनरागमन केले आहे. (Photo: IPL/BCCI)

4 / 5
मुंबई इंडियन्सने सलग तीन सामन्यांमध्ये तीन वेगवेगळे कर्णधार मैदानात उतरवले आहेत. आयपीएलच्या इतिहासात एकाच हंगामात सलग तीन सामन्यांमध्ये तीन वेगवेगळे कर्णधार मैदानात उतरवण्याची ही केवळ दुसरी वेळ आहे. (Photo: IPL/BCCI)

मुंबई इंडियन्सने सलग तीन सामन्यांमध्ये तीन वेगवेगळे कर्णधार मैदानात उतरवले आहेत. आयपीएलच्या इतिहासात एकाच हंगामात सलग तीन सामन्यांमध्ये तीन वेगवेगळे कर्णधार मैदानात उतरवण्याची ही केवळ दुसरी वेळ आहे. (Photo: IPL/BCCI)

5 / 5
यापूर्वीचा हा दुर्मिळ विक्रम 2013 मध्ये पुणे वॉरियर्सच्या नावावर केला होता. तेव्हा रॉस टेलर, अँजेलो मॅथ्यूज आणि ॲरॉन फिंच यांनी सलग सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले होते. आयपीएलमध्ये 13 वर्षांनंतर हा अनोखा पराक्रम घडला आहे. मुंबई इंडियन्सचं या स्पर्धेतील आव्हान आधीच संपुष्टात आलं आहे. पण कर्णधारपदाची संगीत खुर्ची मात्र सुरू आहे. (Photo: IPL/BCCI)

यापूर्वीचा हा दुर्मिळ विक्रम 2013 मध्ये पुणे वॉरियर्सच्या नावावर केला होता. तेव्हा रॉस टेलर, अँजेलो मॅथ्यूज आणि ॲरॉन फिंच यांनी सलग सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले होते. आयपीएलमध्ये 13 वर्षांनंतर हा अनोखा पराक्रम घडला आहे. मुंबई इंडियन्सचं या स्पर्धेतील आव्हान आधीच संपुष्टात आलं आहे. पण कर्णधारपदाची संगीत खुर्ची मात्र सुरू आहे. (Photo: IPL/BCCI)

Follow Us