IRE vs IND : भारताच्या मालिका पराभवानंतर पाकिस्तानचा खेळाडू बरलला, म्हणाला…
Abid Ali X Post On Team India : भारतीय क्रिकेट संघाला श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात टी 20I मालिकेत उलटफेरचा सामना करावा लागला. आयर्लंडने भारताला 2-0 ने पराभूत केलं. भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानच्या माजी खेळाडूने विकृत आनंद साजरा केला आहे.

आयर्लंडने टीम इंडियाचा टी 20I मालिकेत 2-0 अशा फरकाने धुव्वा उडवला. भारताच्या या पराभवानंतर पाकिस्तानचा खेळाडू आबिद अली याने वादग्रस्त विधान केलं आहे. आबिद अली नक्की काय म्हणाला? हे जाणून घेऊयात. (PHOTO CREDIT :GETTY IMAGES)

भारताला पराभूत होताना पाहणं आनंददायक आहे, अशा आशयाची आबिद अली याने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. आबिद अली याची ही पोस्ट व्हायरल झाली आहे. (PHOTO CREDIT :GETTY IMAGES)

आबिद अली याने पाकिस्तानसाठी 16 कसोटी सामन्यांमध्ये 1 हजार 180 धावा केल्या आहेत. तसेच आबिदने या दरम्यान 4 शतकं आणि 3 अर्धशतकं झळकावली आहेत. तसेच आबिदने 6 एकदिवसीय सामन्यांत 234 धावा केल्या आहेत. (PHOTO CREDIT :GETTY IMAGES)

तसेच आबिदने व्यावसायिक क्रिकेटमध्ये 37 शतकं झळकावली आहेत. आबिदने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 11 हार 696 तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये 3 हजार 874 धावा केल्या आहेत. (PHOTO CREDIT :GETTY IMAGES)

दरम्यान टीम इंडियाची आयर्लंड विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गमावण्याची पहिलीच वेळ ठरली. तसेच आयर्लंडने पाकिस्तानलाही 2024 साली पराभूत केलं होतं. (PHOTO CREDIT :GETTY IMAGES)