IND vs IRE: कर्णधार श्रेयस अय्यरवर नामुष्की, असं करणारा भारताचा चौथा कर्णधार ठरला

भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळत आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताला पहिल्याच सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. दुबळ्या आयर्लंडने पराभूत केल्याने एक नकोसा विक्रम प्रस्थापित झाला आहे.

| Updated on: Jun 27, 2026 | 4:17 PM
1 / 5
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेनंतर भारताची कमान सूर्यकुमार यादवकडून श्रेयस अय्यरच्या खांद्यावर दिली गेली आहे. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाचा आयर्लंड दौरा होत आहे. पण त्याच्या नेतृत्वात भारताची खराब आणि निराशाजनक सुरूवात झाली. (PHOTO CREDIT- GETTY)

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेनंतर भारताची कमान सूर्यकुमार यादवकडून श्रेयस अय्यरच्या खांद्यावर दिली गेली आहे. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाचा आयर्लंड दौरा होत आहे. पण त्याच्या नेतृत्वात भारताची खराब आणि निराशाजनक सुरूवात झाली. (PHOTO CREDIT- GETTY)

2 / 5
बेलफास्टमध्ये सुरू असलेल्या दोन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात आयर्लंडने भारताला पराभवाची धूळ चारली. आयर्लंडने भारताला 34 धावांनी पराभूत केलं. या पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम प्रस्थापित झाला आहे. (PHOTO CREDIT- GETTY)

बेलफास्टमध्ये सुरू असलेल्या दोन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात आयर्लंडने भारताला पराभवाची धूळ चारली. आयर्लंडने भारताला 34 धावांनी पराभूत केलं. या पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम प्रस्थापित झाला आहे. (PHOTO CREDIT- GETTY)

3 / 5
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून श्रेयस पहिल्याच सामन्यात पराभवाचं तोंड पाहणारा चौथा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी भारताच्या तीन कर्णधारांना पदार्पणाच्या टी20 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. (PHOTO CREDIT- GETTY)

टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून श्रेयस पहिल्याच सामन्यात पराभवाचं तोंड पाहणारा चौथा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी भारताच्या तीन कर्णधारांना पदार्पणाच्या टी20 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. (PHOTO CREDIT- GETTY)

4 / 5
श्रेयस अय्यरपूर्वी या यादीत विराट कोहली, ऋषभ पंत आणि शुबमन गिल यांचं नाव होतं. भारतीय टी20 संघाची धुरा 15 खेळाडूंनी सांभाळली आहे.. यात 11 कर्णधारांनी पहिला सामना जिंकला आहे. तर अय्यरसह चार कर्णधारांनी पहिला सामना गमावला आहे. (PHOTO CREDIT- GETTY)

श्रेयस अय्यरपूर्वी या यादीत विराट कोहली, ऋषभ पंत आणि शुबमन गिल यांचं नाव होतं. भारतीय टी20 संघाची धुरा 15 खेळाडूंनी सांभाळली आहे.. यात 11 कर्णधारांनी पहिला सामना जिंकला आहे. तर अय्यरसह चार कर्णधारांनी पहिला सामना गमावला आहे. (PHOTO CREDIT- GETTY)

5 / 5
श्रेयस अय्यरच्या नावावर आणखी एक नकोसा विक्रम रचला गेला आहे. आयर्लंडविरुद्ध कोणत्याही फॉर्मेटमध्ये सामना गमावणारा पहिला कर्णधार ठरला आहे. यापूर्वी भारताने आयर्लंडविरुद्ध कोणताही आंतरराष्ट्रीय सामना गमावला नव्हता. (PHOTO CREDIT- GETTY)

श्रेयस अय्यरच्या नावावर आणखी एक नकोसा विक्रम रचला गेला आहे. आयर्लंडविरुद्ध कोणत्याही फॉर्मेटमध्ये सामना गमावणारा पहिला कर्णधार ठरला आहे. यापूर्वी भारताने आयर्लंडविरुद्ध कोणताही आंतरराष्ट्रीय सामना गमावला नव्हता. (PHOTO CREDIT- GETTY)

Follow Us