IND vs SL: विराट कोहली आणि रोहित शर्माच्या पुढे निघून गेला गिल, या कर्णधाराची केली बरोबरी
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली. या विजयासह शुबमन गिलच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. भले कर्णधार गिल या सामन्यात फक्त 24 धावाच करू शकला. पण त्याच्या नेतृत्वात संघाने जबरदस्त कामगिरी केली आहे.

गॉल कसोटी सामन्यात भारताने शुबमन गिलच्या नेतृत्वात श्रीलंकेला पराभवाची धूळ चारली. या सामन्यातील दोन्ही डावात शुबमन गिल फेल गेला. पण श्रीलंकेतील पहिला सामन्यातील विजय त्याच्यासाठी खास ठरला. (Photo: PTI)

भारताने श्रीलंकेला पहिल्या कसोटी सामन्यात 165 धावांनी पराभूत केलं. यासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. पहिल्या सामन्यातील विजयासह गिलने नेतृत्वात भारताने सहावा कसोटी विजय मिळवला आहे. (Photo: PTI)

श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवल्यानंतर पहिल्या 10 कसोटी सामन्यात सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत सहभागी झाला आहे. या यादीत त्याने विराट कोहली आणि रोहित शर्माला मागे टाकलं आहे. (Photo: PTI)

शुबमन गिलच्या कसोटी नेतृत्वाची सुरूवात 2025 मध्ये इंग्लंड दौऱ्यापासून झाली. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघ 10 कसोटी सामने खेळला. यात सहा सामन्यात विजय, 3 सामन्यात पराभव आणि एक सामना ड्रॉ राहिला. त्याने यासह सौरव गांगुलीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. तर धोनी सात विजयासह अव्वल स्थानी आहे. (Photo: PTI)

शुबमन गिलच्या नेतृत्वात भारताने सामना जिंकला. पण त्याचं वैयक्तिक योगदान काही खास राहिलं नाही. दोन्ही डावात त्याची कामगिरी सुमार राहिली. त्याने पहिल्या डावात 16 आणि दुसऱ्या डावात फक्त 8 धावा करून बाद झाला. दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. (Photo: PTI)