T20 World Cup Cup Champion: टीम इंडियाचा वर्ल्डकप स्पर्धेतील जेतेपदाचा प्रवास असा राहिला, फक्त एकच पराभव

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताने न्यूझीलंडला पराभूत करून जेतेपदावर नाव कोरलं आहे. भारताचा या स्पर्धेतील प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. सुपर 8 फेरीत भारताचं स्थान डळमळीत झालं होतं. पण संजू सॅमसनच्या खेळीमुळे सर्व काही ठीक झालं.

| Updated on: Mar 08, 2026 | 10:50 PM
1 / 9
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुरुवात अमेरिकाविरुद्धच्या सामन्याने झाली. या सामन्यात भारताने 20 षटकात 9 गडी गमवून 161 धावा केल्या. तसेच अमेरिकेला 132 धावांवर रोखलं आणि सामना 29 धावांनी जिंकला. (Photo- BCCI Twitter)

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुरुवात अमेरिकाविरुद्धच्या सामन्याने झाली. या सामन्यात भारताने 20 षटकात 9 गडी गमवून 161 धावा केल्या. तसेच अमेरिकेला 132 धावांवर रोखलं आणि सामना 29 धावांनी जिंकला. (Photo- BCCI Twitter)

2 / 9
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील दुसरा सामना नामिबियाविरुद्ध झाला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 209 धावा केल्या. तसेच नामिबियाला 116 धावांवर सर्वबाद केलं. हा सामना भारताने 93 धावांनी जिंकला.(Photo- BCCI Twitter)

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील दुसरा सामना नामिबियाविरुद्ध झाला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 209 धावा केल्या. तसेच नामिबियाला 116 धावांवर सर्वबाद केलं. हा सामना भारताने 93 धावांनी जिंकला.(Photo- BCCI Twitter)

3 / 9
भारताचा या स्पर्धेतील तिसरा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी झाला. या सामन्यात भारताने 175 धावांपर्यंत मजल मारली. तर पाकिस्तानला 114 धावांवर रोखलं आणि सामना 61 धावांनी जिंकला. (Photo- BCCI Twitter)

भारताचा या स्पर्धेतील तिसरा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी झाला. या सामन्यात भारताने 175 धावांपर्यंत मजल मारली. तर पाकिस्तानला 114 धावांवर रोखलं आणि सामना 61 धावांनी जिंकला. (Photo- BCCI Twitter)

4 / 9
भारत आणि नेदरलँड हे चौथ्या सामन्यात आमनेसामने आले. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 193 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना नेदरलँडने 176 धावा केल्या. भारताने हा सामना 17 धावांनी जिंकला. सुपर 8 फेरीसाठी सज्ज झाला. (Photo- BCCI Twitter)

भारत आणि नेदरलँड हे चौथ्या सामन्यात आमनेसामने आले. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 193 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना नेदरलँडने 176 धावा केल्या. भारताने हा सामना 17 धावांनी जिंकला. सुपर 8 फेरीसाठी सज्ज झाला. (Photo- BCCI Twitter)

5 / 9
सुपर 8 फेरीतील पहिल्याच सामन्यात भारताला दक्षिण अफ्रिकेने दणका दिला. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने 187 धावा केल्या. पण भारताला फक्त 111 धावा करता आल्या. हा सामना भारताने 76 धावांनी गमावला. त्यामुळे नेट रनरेटचं गणित बिघडलं होतं. (Photo- BCCI Twitter)

सुपर 8 फेरीतील पहिल्याच सामन्यात भारताला दक्षिण अफ्रिकेने दणका दिला. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने 187 धावा केल्या. पण भारताला फक्त 111 धावा करता आल्या. हा सामना भारताने 76 धावांनी गमावला. त्यामुळे नेट रनरेटचं गणित बिघडलं होतं. (Photo- BCCI Twitter)

6 / 9
सुपर 8 फेरीतील दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेचा संघ समोर होता. हा सामना भारताने 72 धावांनी जिंकला. भारताने 256 धावा केल्या आणि झिम्बाब्वेचा संघ 184 धावा करून शकला. पण या सामन्यातून नेट रनरेट काही सुधारला नाही. (Photo- BCCI Twitter)

सुपर 8 फेरीतील दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेचा संघ समोर होता. हा सामना भारताने 72 धावांनी जिंकला. भारताने 256 धावा केल्या आणि झिम्बाब्वेचा संघ 184 धावा करून शकला. पण या सामन्यातून नेट रनरेट काही सुधारला नाही. (Photo- BCCI Twitter)

7 / 9
सुपर 8 मध्ये करो या मरोचा सामना किंवा उपांत्यपूर्व फेरीचा सामना म्हणा हा वेस्ट इंडिजविरुद्ध झाला. या सामन्यात वेस्ट इंडिजने 195 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. पण भारताने हे लक्ष्य 19.2 षटकात 5 गडी गमवून पूर्ण केलं. हा सामना जिंकून भारताने उपांत्य फेरी गाठली.(Photo- BCCI Twitter)

सुपर 8 मध्ये करो या मरोचा सामना किंवा उपांत्यपूर्व फेरीचा सामना म्हणा हा वेस्ट इंडिजविरुद्ध झाला. या सामन्यात वेस्ट इंडिजने 195 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. पण भारताने हे लक्ष्य 19.2 षटकात 5 गडी गमवून पूर्ण केलं. हा सामना जिंकून भारताने उपांत्य फेरी गाठली.(Photo- BCCI Twitter)

8 / 9
उपांत्य फेरीत भारतासमोर इंग्लंडचं आव्हान होतं. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 253 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंड विजयाच्या वेशीवर आलं होतं. पण निसटता पराभव झाला. भारताने हा सामना 7 धावांनी जिंकला आणि अंतिम फेरी गाठली. (Photo- BCCI Twitter)

उपांत्य फेरीत भारतासमोर इंग्लंडचं आव्हान होतं. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 253 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंड विजयाच्या वेशीवर आलं होतं. पण निसटता पराभव झाला. भारताने हा सामना 7 धावांनी जिंकला आणि अंतिम फेरी गाठली. (Photo- BCCI Twitter)

9 / 9
भारताचा अंतिम फेरीत सामना न्यूझीलंडशी झाला. या सामन्यात भारताने 255 धावा केल्या आणि विजयासाठी 256 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना न्यूझीलंडचा संघ 159 धावा केल्या. हा सामना भारताने 96 धावांनी जिंकला आणि जेतेपदावर नाव कोरलं. (Photo- BCCI Twitter)

भारताचा अंतिम फेरीत सामना न्यूझीलंडशी झाला. या सामन्यात भारताने 255 धावा केल्या आणि विजयासाठी 256 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना न्यूझीलंडचा संघ 159 धावा केल्या. हा सामना भारताने 96 धावांनी जिंकला आणि जेतेपदावर नाव कोरलं. (Photo- BCCI Twitter)

Follow Us