
विराट कोहलीने महान फलंदाजांच्या यादीमध्ये स्थान मिळवलंच आहे. त्यासोबतच तो एक सर्वात यशस्वी कॅप्टन आहे. 2022 साली विराटने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेनंतर कॅप्टन्सी सोडली होती.

विराट कोहली कसोटी संघाचा कर्णधार असताना त्याने आपल्या नेतृत्त्वात सर्वाधिक 40 सामने जिंकलेत. कोहलीने कर्णधारपद सोडलं होतं, तेव्हा वादाचा मुद्दा ठरला होता. विराट आणि तत्कालीन बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यात काहीतरी बिनसल्याची चर्चा होत होती.

विराट कोहलीने कसोटी संघाची कर्णधारपदाची जबाबदारी आणखी काही दिवस सांभाळायला हवी होती, असं टीम इंडियाचे माजी बॅटींग कोच संजय बांगर यांनी एका पॉडकास्टमध्ये म्हटलं आहे.

टीम इंडियाला विदेशात सर्वाधिक विजय मिळवून देण्याची मानसिकता विराट कोहलीची होती, असंही संजय बांगर म्हणाले.

टीम इंडियाकडून 68 सामन्यात विराट कोहलीने कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली होती. यामध्ये त्याने 40 सामन्यात विजय मिळवला.