‘धुरंधर 2’पेक्षा 150 पटीने खतरनाक थ्रिलर चित्रपट; पाचव्याला तर तोडच नाही
जर तुम्हाला थ्रिलर चित्रपटांची आवड असेल तर नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर एकापेक्षा एक चित्रपट उपलब्ध आहेत. त्यापैकी आम्ही तुम्हाला काही नावं सुचवणार आहोत. या चित्रपटांमध्ये 'धुरंधर 2'पेक्षा कित्येक पटींनी अधिक थ्रिल, सस्पेन्स आणि थक्क करणारी वळणं आहेत.

अन्वेषिप्पिन कंडेथुम: टोविनो थॉमसची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट एक पोलीस प्रोसिजरल थ्रिलर आहे. वेगवेगळ्या गुंतागुंतीच्या प्रकरणांचा तपास कसा केला जातो, याचं चित्रण यात करण्यात आलं आहे. 1990 च्या दशकात घडणाऱ्या या चित्रपटात एक तरुण सब इन्स्पेक्टर आणि त्याची टीम पुरावे शोधण्याचा प्रयत्न करताना दिसतात. हा चित्रपट फक्त अॅक्शनपेक्षा तपास आणि तपशिलांवर अधिक लक्ष केंद्रीत करतो.

जन गण मन: या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन आणि सूरज वेंजारामुडू यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा एका कॉलेजच्या प्राध्यापकाच्या हत्येवर आणि त्यानंतरच्या कायदेशीर लढाईवर आधारित आहे. या कोर्टरुम ड्रामामध्ये सामाजिक न्याय, जातीयवाद आणि पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करतो. हा चित्रपट शेवटपर्यंत तुम्हाला विचार करायला भाग पाडेल.

इरट्टा: जोजू जॉर्जची मुख्य भूमिका असलेला हा एक क्राइम ड्रामा आहे. जुळ्या भावंडांचं गुंतागुंतीचं नातं आणि त्यांचा भूतकाळ याभोवती याची कथा फिरते. जुळ्या भावांपैकी एकाचा पोलीस ठाण्यात संशयास्पद मृत्यू होतो, तेव्हा कथेतम मोठं वळण येतं. यापैकी दुसरा भाऊ स्वत: एक पोलीस अधिकारी असतो. तोच भावाच्या मृत्यूच्या तपासाची सूत्रे हाती घेतो. या चित्रपटाचा क्लायमॅक्स थक्क करणारा आहे.

ऑफिसर ऑन ड्युटी: हा अत्यंत लोकप्रिय मल्याळम क्राइम थ्रिलर आहे. यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचा एक गुंतागुंतीचं प्रकरण सोडवण्याचा संघर्ष दर्शवण्यात आला आहे. रहस्य, कायदा-सुव्यवस्था यांची योग्य गुंफण कथेत करण्यात आली आहे. कलाकारांचा दमदार अभिनय आणि उत्तम दिग्दर्शन यामुळे हा चित्रपट कुठेच कंटाळवाणा वाटत नाही.

महाराजा: विजय सेतुपतीच्या करिअरमधील हा 50 वा चित्रपट आहे. एका सामान्य न्हाव्याभोवती याची कथा फिरते, ज्याची कचऱ्याची पेटी चोरीला जाते. हे ऐकायला जरी सोपं वाटत असलं तरी जसजसा पोलिसांचा तपास पुढे जातो, तसतशी कथा थरारक वळणांसह उलगडत जाते. या चित्रपटात अनुराग कश्यपने खलनायकाच्या भूमिकेत जबरदस्त अभिनय केला आहे. या चित्रपटाची पटकथा आणि शेवट इतका प्रभावी आहे की प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरश: काटा येतो. कल्ट थ्रिलर चित्रपटांमध्ये याचा आवर्जून उल्लेख होतो.